Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नाला निघालेले वऱ्हाड पोहोचले पोलीस ठाण्यात,

Webdunia
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (21:43 IST)
अकोला कोरोनाचा धोका वाढत असल्याने, लग्न समारंभांवर कडक निर्बंध आणले जात आहेत. मात्र अशातही  हिंगोली येथून निघालेल्या लग्नाच्या वऱ्हाडाला लग्नमंडपात न जाता थेट पातूर पोलिसात जावे लागले. यावेळी पोलिसांनी कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन चालकांविरोधात गुन्हा दाखल केला.
 
रविवारी अकोला जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी लागू केली होती. मात्र अशातही हिंगोली येथून पातूर येथे वऱ्हाडाचे तीन टेम्पो भरून आले होते. ही बाब जेव्हा पोलिसांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी वऱ्हाडी मंडळींना थेट पोलीस ठाण्यातच बोलावून घेतले. याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ‘हिंगोली येथून तीन वाहने तालुक्यातील शिर्ला येथे लग्नासाठी तब्बल ३९ वऱ्हाडी घेऊन निघाले होते. यामध्ये नवरदेवाचाही समावेश होता. तीनही वाहनांना थाबंवित विचारणा केली असता, हा संपूर्ण प्रकार समोर आली. यावेळी पोलिसांनी तीन्ही वाहनांवर कारवाई करीत वाहने पोलीस ठाण्यात जमा केले होते.
 
दरम्यान, लग्न हा महत्त्वाचा भाग म्हणून नवरदेव व ३९ वऱ्हाडींना सोडून देण्यात आले. मात्र वाहन (एमएच ३८ एल २४९६) चे चालक यादव कानोजी फाळके (रा. जयपूर, हिंगोली), वाहन (एमएच ३८, ७०५०) चे चालक रतन मोतीराम वैराट (रा. खंडाळा, हिंगोली) आणि वाहन (एमएच ३८ एक्स १९३०) चे चालक पांडूरंग भिकातजी गाडे ( रा. जयपूर, जि. हिंगोली) या तीनही चालकांविरूद्ध कलम १८८, २६९ नुसार कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments