Festival Posters

फेब्रुवारी 2021 पर्यंत संपुष्टात येणार कोरोना

Webdunia
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020 (10:08 IST)
भारतात कोरोना संक्रमणाने आपला सर्वोच्च टप्पा पार केल्याचा दावा केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेल्या एका सरकारी समितीने केला आहे. समितीने केलेल्या दाव्यानुसार, फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोना संक्रमण संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
 
भारतात कोरोना रुग्णांची संख्या 10.6 दशलक्ष अर्थात एक कोटी सहा लाखांहून पुढे जाणार नाही, असा कासही या समितीने बांधला आहे. उल्लेखनीय म्हणजे, भारतात सध्या एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 75 लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. व्हायरसपासून बचावासाठी करण्यात येणारे उपाय यापुढे सुरूच ठेवायला हवेत, असा सल्लाही समितीने दिला आहे.
 
कोरोना स्थितीचे आकलन करण्यासाठी केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांच्याकडून या समितीने गठण करण्यात आले होते. आयआयटी हैदराबादचे प्रोफेसर ए. विद्यासागर हे या समितीचे प्रमुख आहेत. समितीच्या म्हणण्यानुसार, भारताने मार्च महिन्यात लॉकडाउन घोषित केला नसता तर देशभरात 25 लाखांहून अधिकमृत्यू झाले असते. 
 
अधिकृत आकडेवारीनुसार, भारतात एव्हाना 1.14 लाख कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

'पवारांना त्यांचे शिष्य सल्ला देत आहे,' राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या अटकळांवर संजय राऊत यांचा कडक उपहास

NCP party merger 'शोकसभेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणावर बोलतील; आमदार रोहित यांचे विधान

९ फेब्रुवारी रोजी पुण्याला नवीन महापौर मिळणार; अजित पवार यांच्या निधनामुळे कोणतेही उत्सव होणार नाही

LIVE: रोहित पवार यांनी १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचे आवाहन केले

मेघालयातील "बेकायदेशीर" कोळसा खाणीत स्फोट, १६ कामगारांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments