Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फेब्रुवारी 2021 पर्यंत संपुष्टात येणार कोरोना

Webdunia
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020 (10:08 IST)
भारतात कोरोना संक्रमणाने आपला सर्वोच्च टप्पा पार केल्याचा दावा केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेल्या एका सरकारी समितीने केला आहे. समितीने केलेल्या दाव्यानुसार, फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोना संक्रमण संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
 
भारतात कोरोना रुग्णांची संख्या 10.6 दशलक्ष अर्थात एक कोटी सहा लाखांहून पुढे जाणार नाही, असा कासही या समितीने बांधला आहे. उल्लेखनीय म्हणजे, भारतात सध्या एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 75 लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. व्हायरसपासून बचावासाठी करण्यात येणारे उपाय यापुढे सुरूच ठेवायला हवेत, असा सल्लाही समितीने दिला आहे.
 
कोरोना स्थितीचे आकलन करण्यासाठी केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांच्याकडून या समितीने गठण करण्यात आले होते. आयआयटी हैदराबादचे प्रोफेसर ए. विद्यासागर हे या समितीचे प्रमुख आहेत. समितीच्या म्हणण्यानुसार, भारताने मार्च महिन्यात लॉकडाउन घोषित केला नसता तर देशभरात 25 लाखांहून अधिकमृत्यू झाले असते. 
 
अधिकृत आकडेवारीनुसार, भारतात एव्हाना 1.14 लाख कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित माहिती

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकली क्रोधद्दष्टी, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवित हानी नाही

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

पुढील लेख
Show comments