Marathi Biodata Maker

दोन ते तीन महिन्यात करोनावर लस येण्याची शक्यता

Webdunia
रविवार, 7 जून 2020 (09:18 IST)
आगामी दोन ते तीन महिन्यात करोनावर लस येण्याची शक्यता आहे असा अंदाज एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केला आहे. भारताची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे करोनाची रुग्णसंख्या वाढते आहे. मात्र येत्या दोन ते तीन महिन्यात करोनावरची लस शोधण्यात यश मिळेल अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
 
कोरोना रुग्णांचा  मृत्यू दराचा विचार केला तर जगाच्या तुलनेत भारताचं हे प्रमाण नक्कीच कमी आहे. आपल्या देशाची लोकसंख्या जास्त आहे.. त्यामुळे येणाऱ्या काळात काही केसेस वाढतील असंही गुलेरिया यांनी म्हटलं आहे.
 
लॉकडाउनच्या अटी आता हळूहळू शिथिल होत आहेत. अशावेळी आपल्या देशातल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढते आहे. बाहेर जाताना मास्क लावणं, हात धुणं, हँड सॅनिटायजरचा वापर करणं या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे पाळाव्याच लागतील. लॉकडाउन संपला म्हणजे करोनाचा धोका टळला असे नाही. लॉकडाउनच्या अटी शिथिल होऊ लागल्या असल्या तरीही करोना व्हायरस आहेच. त्यामुळे देशातल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढते आहे असे सांगितले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

आर्यना सबालेन्काने अंतिम फेरीत कोको गॉफला हरवून मियामी ओपनचे विजेतेपद पटकावले

रविचंद्रन अश्विन अमेरिकन फ्रँचायझी मेजर लीग क्रिकेट एमएलसीमध्ये सामील होणार

अशोक खरात प्रकरणात गुरु-शिष्य' संबंधांची चौकशी होणार, सुषमा अंधारे यांचा खुलासा

LIVE: मुंबई विमानतळावर बॉम्बच्या खोट्या धमकीमुळे घबराट

मी महिलांसोबत जे केले ते एका विधीचा भाग होते," अशोक खरातचा असा विचित्र दावा

पुढील लेख
Show comments