Festival Posters

या लोकांना कोरोना लसीसाठी 9 महिने थांबावे लागणार ? नवीन नियम जाणून घ्या

Webdunia
मंगळवार, 18 मे 2021 (16:05 IST)
कोरोना होऊन गेलाय, आता लस कधी घेऊ शकतो हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे? यावर उत्तर म्हणजे नवीन नियमाप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला तर त्याला रिकव्हर होऊन नऊ महिने झाल्यानंतरच लस घेता येणार आहे. नॅशनल ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन (NEGVAC) लवकरच याबाबत निर्णय सुनावण्याची शक्यता आहे. 
 
एखाद्या व्यक्तीने कोरोनावर मात केल्यानंतर त्याच्या शरीरात अँटिबॉडी तयार होतात. या अँटिबॉडी पुढील काही महिने त्याचे कोरोनापासून रक्षण करतात. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना 9 महिन्यांनंतर लसीचा डोस द्यावा, अशी शिफारस NEGVAC याबद्दलचा निर्णय घेण्याचा शक्यता आहे. अनेक बाबींची पडताळणी केल्यानंतर तज्ज्ञांच्या टीमनं हा सल्ला दिला आहे. 
 
लसीकरणाबाबतच्या नियमांमध्ये सतत बदल होत आहेत. नुकतंच रिकव्हरीनंतर लसीकरणाचा कालावधी सहा महिने करण्यात आला होता. मात्र, आता हा आणखी वाढवून 9 महिने करण्याची शक्यता आहे.
 
NIAGI च्या या सल्ल्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या मंजुरीची आवश्यकता आहे. त्यामुळे ही सूचना आता केंद्र सरकारकडे पाठवली आहे. NIAGI ने हा सल्ला देण्यापूर्वी कोविशील्ड लसीच्या दुसऱ्या डोसबाबतही महत्वाची सूचना केली होती. कोविशील्ड लसीच्या दोन्ही डोस मधील अंतर 12 ते 16 आठवडे करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर सरकारकडून त्याची अंमलबजावणी झाली आहे.
 
कोविन पोर्टलवरही आता दुसऱ्या डोससाठीचा पर्याय 84 दिवसांनंतरच दिसत आहे. तर, कोरोनातून रिकव्हर झालेल्या व्यक्तींना पहिले सहा महिने लस घेता येणार नव्हती. मात्र, आता हा काळ आणखी वाढवून 9 महिने केला जाऊ शकतो. तर, गर्भवती महिलांकडे डिलेव्हरीनंतर लस घेण्याचा पर्याय आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

ईव्हीएमवर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी देखील याच मशीनने जिंकले

ठाकरे बंधूं एकत्र आल्याने फायदा महायुतीचा होणार, रामदास आठवले यांचे विधान

मुंबईत 1000 एकर जमिनीवर 50 हजार घरे बांधली जातील, पियुष गोयल यांचा दावा

LIVE: राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीच्या तारखांची घोषणा

बीएमसी निवडणुकीपूर्वी, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप पक्षात प्रवेश

पुढील लेख
Show comments