Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विश्वचषक क्रिकेट : भारताच्या गोलंदाजीची बाजू भक्कम

Webdunia
मंगळवार, 21 मे 2019 (16:07 IST)
भारताचा सलामीचा माजी फलंदाज लालचंद राजपूत यांना आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या गोलंदाजीची बाजू भक्कम वाटत आहे.
 
भारताचा संघ या विश्वचषक स्पर्धेचा संभाव्य दावेदार आहे, असेही राजपूत यांना वाटते. विश्वचषक स्पर्धेत दहा संघ आहेत. या सर्व संघातील गोलंदाजीची क्षमता लक्षात घेतल्यास भारताच्या गोलंदाजीची बाजू मजबूत व सर्वोत्तम आहे. त्यामुळे भारत विजेतेपदाचा दावेदार आहे असे ते म्हणाले. 
 
भारताकडे सर्वोत्तम आक्रमण असले तरी हा संघही संतुलित आहे. या संघात चांगले अष्टपैलू खेळाडूही आहेत. इतर संघाच्या तुलनेत भारताचा संघ सरस आहे, अशी भर राजपूतने घातली. मुंबई नॉर्थ इस्ट संघाचा मेन्टॉर आहे.
 
भारताच संघाला पराभूत करणे हे फारच कठीण आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या हा जमेची बाजू आहे. रवींद्र जडेजा तळात फलंदाजी करू शकतो. 
 
भारताचा संघ उपान्त्य फेरीत नक्कीच असेल असे ते म्हणाले. राजपूत हे सध्या झिम्बाब्वे संघाचेही प्रशिक्षक आहेत.
 
भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुध्द 5 जून रोजी विश्वचषकाचा पहिला साखळी सामना खेळणार आहे. 
 
2007 साली भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत खेळली गेलेली पहिलीच टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकली. या विजेत्या संघाचे राजपूत हे क्रिकेट व्यवस्थापक होते. शिखर धवन, रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली हे टॉप तीन फलंदाज या संघात आहेत.
 
2007 च्या आणि सध्याच्या विश्वचषक संघात काय  साम्य आहे असे विचारले असता राजपूत उत्तरले की, सध्याच्या संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. एकदिवसी स्पर्धेत अष्टपैलू खेळाडूंचा वाटा महत्त्वाचा ठरतो. पहिले तीन खेळाडू आणि अष्टपैलू खेळाडू यांच्यावर भारतीय संघाचे भवितव्य अवलंबून आहे असे ते म्हणाले.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

RR vs DC : आज ऋषभ पंत साठी करो या मरोचा सामना, प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीचा जिंकण्याचा प्रयत्न असणार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

SRH vs MI :मुंबईने हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला

IND vs BAN Women's T20: भारतीय महिला संघाचा बांगलादेशविरुद्ध सलग चौथा विजय

पुढील लेख
Show comments