Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

समर्थांचे टाकळी

वेबदुनिया
NDND
नाशिक शहरातच असलेल्या आणि नासर्डी (नंदिनी) नदीच्या तीरावर वसलेल्या टाकळी या छोट्या गावाचे महत्त्व समर्थ संप्रदायात मोठे आहे. समर्थ रामदास लग्नाच्या वेदीवरून पळून आल्यानंतर नाशिकलाच आले होते. याच टाकळी येथे त्यांनी १६२० ते १६३२ अशी बारा वर्षे तपश्चर्या केली. नदीत उभे राहून ते तपश्चर्या करत असत. बलोपासनेचा प्रचार आणि प्रसाराचे व्रत त्यांनी येथूनच सुरू केले. टाकळीच समर्थ विचारांचा पाया रचला गेला. त्यामुळे या गावाला मोठे महत्त्व आहे.

टाकळीत समर्थ रामदासांचा आश्रम नंदिनी नदीला लागून आहे. समर्थ रामदासांनी साधना केली ती गुहा, त्यांच्या पुजेतील राममूर्ती, समर्थांनी स्थापन केलेले शेणाचा पहिला हनुमान ही महत्त्वाची ठिकाणे येथे आहेत.

शिवकालापासून येथे असेलला आश्रम गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षिततेच्या गर्तेत सापडला होता. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला भेट द्यायला येणार्‍या भाविकांना समर्थ संप्रदायातील एक महत्वाचे केंद्र येथे आहे हे माहितच नव्हते. आश्रमाची एकूण अवस्थाही फारशी चांगली नव्हती. मात्र, नंतर नाशिक महापालिकेने पुढाकार घेऊन या परिसराचे स्वरूप आमुलाग्र बदलून टाकले. सिंहस्थ काळात आलेल्या निधीने या आश्रमाचा कायापालट झाला. त्यानंतर जीर्णौद्धार असलेला हा आश्रम मनाला शांतता देतो.

आता इथे भाविकांचीही चांगली गर्दी होते. समर्थ संप्रदायातील लोक तर येथे येतातच, पण त्याशिवायही भाविकांची गर्दी असते. दासनवमीला येथे मोठी यात्रा भरते. मनाचे श्लोक, दासबोध पाठांतराच्या स्पर्धा, सुर्यनमस्काराच्या स्पर्धाही या निमित्ताने घेतल्या जातात.

टाकळी येथे जाण्यासाठी नाशिकला यावे लागेल. नाशिकचेच ते एक उपनगर आहे. नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून येथे जाण्यासाठी बस तसेच रिक्षा उपलब्ध आहेत. याशिवाय रेल्वे स्थानकापासून येथे येण्यासाठी रिक्षा उपलब्ध असतात.

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Show comments