Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुळशी विवाह करण्याची पद्धत

वेबदुनिया
कार्तिक शुक्ल एकादशीपासून पुढे चार दिवस तुळशी विवाह लावला जातो. तुळशीला विष्णू-प्रिया असेही संबोधले जाते. तुळशी विवाहासाठी कार्तिक शुक्ल नवमी ही तिथी योग्य आहे. परंतु, काही जण एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी पूजा करतात व पाचव्या दिवशी तुळशीचा विवाह करतात. तुळशीचा विवाह देवाशी म्हणजेच श्रीकृष्णाशी लावला जातो. 
तुळशी व‍िवाह कसा करावा?
तुळशी व‍िवाहाच्या तीन महिने आधीपासून तुळशीच्या रोपाला नियमित पाणी घालून त्याची पूजा करावी. 
मुहूर्तानुसार मंत्रोच्चारण करून दाराला तोरण लावा व मंडप लावा.
चार पुरोहितांकरवी गणपती-मातृका पूजा करा.
यानंतर लक्ष्मी-नारायणाची मूर्ती व तुळशीपत्रासोबत सोने व चांदीची तुळस आसनावर ठेवा.
यजमानाने पत्नीसोबत उत्तराभिमुख आसन ग्रहण करावे. 
गोरज मुहूर्तावर (वराचे) देवाचे पूजन करावे. 
मंत्रोच्चारासहित कन्येस (तुळशीस) दान करावे. 
यानंतर हवन व अग्नीभोवती सप्तपदी पूर्ण करावी. 
नंतर वस्त्र व आभूषणे घालावित. 
नंतर ब्राह्मण भोजन करवून मग स्वत: अन्न ग्रहण करावे. 
शेवटी मंगलाष्टकांनी विवाह लावावा. 
तुळशीचे महत्त्व 
तुळशी हे दिसायला साधारण रोप असले तरी भारतीयांसाठी ते पवित्र आहे. 
पूजेच्या साहित्यात तुळशीपत्र गरजेचे असते. त्याशिवाय देव प्रसाद ग्रहण करत नाहीत, असे मानले जाते. 
नवमी, दशमीचे व्रत व पूजा करून नंतरच्या दिवशी तुळशीचे रोप ब्राह्मणाला दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. 
स्नानानंतर रोज तुळशीच्या रोपाला पानी देणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. 
तुळशीमुळे तिच्या आसपासच्या वातावरणातील हवा शुध्द होते.
तुळशीपत्रांचा अर्क बर्‍याच आजारांवर रामबाण उपाय ठरतो.

संबंधित माहिती

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments