Dharma Sangrah

ग्रहण सुटल्यावर काय करावे

Webdunia
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (12:40 IST)
Chandra Grahan 2022 आज कार्तिक पौर्णिमा तिथीला वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आहे. हे संपूर्ण चंद्रग्रहण असेल, जे देशात आणि जगात पाहता येईल. हे चंद्रग्रहण भारतात अंशतः दिसणार आहे, परंतु देशाच्या पूर्वेकडील काही भागात चंद्रोदयाच्या वेळी संपूर्ण चंद्रग्रहण दिसेल. 08 नोव्हेंबर रोजी सकाळपासूनच ग्रहणाचा सुतक कालावधी सुरू होईल. भारतात ग्रहण असल्यामुळे त्याचा सुतक कालावधी वैध असेल. सुतकामध्ये शुभ कार्य आणि सर्व प्रकारचे धार्मिक विधी निषिद्ध आहेत. यावेळी सर्व मंदिरांचे दरवाजे बंद असतात. ग्रहण संपल्यावरच सुतक संपतं, मग घरोघरी गंगाजल शिंपडून आणि स्नान करून मंदिरात पूजा केली जाते. ग्रहणकाळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. जाणून घेऊया वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणातील सर्व खास गोष्टी...
 
चंद्रग्रहण दरम्यान काय करावे
ग्रहण सुरू होण्याआधी, म्हणजेच जेव्हा सुतक चालू असेल तेव्हा आधीच तोडलेली तुळशीची पाने अन्नपदार्थांमध्ये ठेवावीत.
ग्रहणकाळात आपल्या इष्ट देवतांच्या नावांचे स्मरण करावे.
ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी ग्रहण काळात मंत्रांचा जप करावा.
ग्रहण संपल्यानंतर घरभर गंगाजल शिंपडावे.
 
चंद्रग्रहण काळात हे काम करु नका
ग्रहणकाळात देवी-देवतांचे कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा करू नये.
ग्रहणकाळात अन्न शिजवू नये, खाऊ किंवा पिऊ नये.
गरोदर महिलांनी ग्रहण पाहू नये किंवा ग्रहण काळात घराबाहेर पडू नये.
ग्रहण काळात तुळशीसह इतर झाडांना स्पर्श करू नये.
 
ग्रहण सुटल्यावर हे करा
चंद्रग्रहण काळावधी संपल्यावर सुतकही संपतं. ग्रहण संपल्यानंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात गंगाजल शिंपडा. घर, दुकान, आस्थापना स्वच्छ करा आणि ते चांगले धुवा. असे मानले जाते की गंगाजल किंवा कोणत्याही पवित्र नदीचे पाणी शिंपडल्याने नकारात्मकता संपते आणि ग्रहणाचा प्रभावही संपतो. ग्रहणानंतर स्नान करावे. जर तुम्ही स्नान करू शकत नसाल तर स्वतःवर गंगाजल शिंपडा. स्वत: स्नान करुन देवतांना स्नान घाला. मंदिर स्वच्छ करा. यानंतर अन्नपदार्थांवर गंगाजल शिंपडून ते शुद्ध करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Powerful Maruti Stotra मारुती स्तोत्र पठण करण्याची योग्य वेळ कोणती?

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

Hanuman Jayanti Special मारुतीरायाला प्रिय असलेल्या खास नैवेद्य पाककृती

प्रसिद्ध अकरा मारुती : समर्थ रामदास स्वामी स्थापित अकरा मारुतींची माहिती

२ एप्रिल २०२६ रोजी, भगवान हनुमानाचा हा अत्यंत प्रभावी मंत्र फक्त एकदाच म्हणा—तुमचा सर्वात मोठा शत्रूही तुमच्यासमोर नतमस्तक होईल

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

पुढील लेख
Show comments