Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजेंच्या दहशतीविरूद्ध जनाधार: गेहलोत

भाषा
सोमवार, 8 डिसेंबर 2008 (16:42 IST)
राजस्थानमधील मतदारांनी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या दहशतीच्या राजवटीविरूद्ध मतदान केले असल्याचेचे कॉंग्रेसचे सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या मुद्दयावर भाजपने रान उठवल्यानंतरही राजस्थानमधील मतदारांनी कॉंग्रेसलाच मतदान केले आहे. यामधून या मुद्दयाचा त्यांच्यावर प्रभाव पडला नसल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणाले.

राजे यांच्या राजवटीत सामान्यजन दहशतीच्या छायेत होते. या जनाधारातून त्यांना या दहशतीच्या सावटातून बाहेर पडायचे होते, हे स्पष्ट होते, असे ते म्हणाले. वसुंधरा राजे यांचे वचन आणि वचनपूर्ती यामध्ये मतदारांना कमालीची तफावत जाणवली.

भाजपने दिलेले आश्वासने आणि केलेली कामे यातील फरक त्यांनी जाणला. पोलिस गोळीबाराच्या २७ घटनांत ९१ शेतकरी बळी पडले. मिना आणि गुज्जर समाजात असंतोष निर्माण झाला आणि त्यांना राज्य सरकारने फसवल्याचे ज्ञात झाले.

एकंदरीत राजे यांच्या नेतृत्वाखालीली राजवट सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा दावा गेहलोत यांनी केला.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

Show comments