Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निबंध : माणसाचा खरा दागिना निरोगी बळकट शरीर

Webdunia
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (23:05 IST)
आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत. आपण सर्वांना या धावपळीच्या जीवनातून किमान स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे. आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम केला पाहिजे. योग्य आहार, पुरेशी झोप, फळांचे सेवन नियमितपणे केले पाहिजे. शरीर चांगले सुदृढ असेल तर आपण काहीही करू शकतो. प्राचीन काळापासूनच सुदृढ आणि निरोगी शरीराचे महत्व आहे. प्राचीन काळात माणूस निसर्गसच्या सानिध्यात राहत आहे. परंतु हळू - हळू काळ लोटला आणि नवीन नवीन यंत्राचा शोध लागला आणि माणूस त्याच्या आहारी गेला. आज तरुणांना देखील कमी वयात मोठेमोठे आजार होत आहेत. शरीर निरोगी असेल तर माणसाचा ज्ञानाचा आणि विद्ववतेचा उपयोग आहे. 

शरीर हे माणसाची खरी मोठी संपत्ती आहे. धन किंवा संपत्ती गेल्यावर पुन्हा मिळविता येते परंतु शरीररूपी संपत्ती ढासळली तर परत मिळविणे कठीण आहे. शरीराची काळजी घेतली पाहिजे. शरीराची स्वच्छता राखणे हे खूप आवश्यक आहे. काही चांगल्या गोष्टीची  सवय लावायला पाहिजे. जेवण्यापूर्वी किंवा बाहेरून आल्यावर हात,पाय तोंड धुणे, दररोज दात घासणे, आंघोळ करणे. नखे कापणे, केस विंचरणे अशा चांगल्या सवयींना अवलंबविल्याने शरीर निरोगी आणि सुदृढ राहील.असं म्हणतात की "आरोग्यम धन संपदा "  तर या शरीराच्या आरोग्य रुपी संपदेची जोपासना करणे आपले मुख्य कर्तव्य आहे. 
 
या साठी काही सवयी अवलंबवा आणि त्यांना अंगीसार करा -
 
* दररोज नियमानं व्यायाम करा.
* जेवणापूर्वी हात धुवावे.
* वेगवेगळ्या ऋतूंमध्ये ऋतूला साजेशी आहार घ्या.
* पावसाळ्यात आणि हिवाळ्यात थंड पदार्थ खाऊ नये.
* पावसाळ्यात तेलकट तुपकट खाऊ नये.
* पूर्ण आणि पुरेशी झोप घ्या. 
* दररोज एक फळ खा.
* पौष्टीक आहार घ्या.
* भाज्या स्वच्छ धुवून घ्या.
* शरीराची स्वच्छता राखा.  
आपण हे सर्व सवयी अवलंबवा तरच आपले आरोग्य सुदृढ  राहील.

संबंधित माहिती

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

कूलरचे पाणी फक्त 2 दिवसांनी गलिच्छ दिसू लागते, म्हणून या 7 हेक्सचे अनुसरण करा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

उन्हाळ्यामध्ये नेहमी खावे अक्रोड, जाणून घ्या योग्य वेळ आणि योग्य पद्धत

तुम्हालाही सकाळी उठल्यावर मळमळल्या सारखे वाटते का? ही गंभीर कारणे असू शकतात

लिक्विड लिपस्टिक सहज काढत नाही? या हॅकच्या मदतीने हे काम 1 मिनिटात होईल

पुढील लेख
Show comments