Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अवघ्या देशाने केला शहिदांना सलाम

वेबदुनिया
गुरूवार, 26 नोव्हेंबर 2009 (12:47 IST)
ND
ND
मुंबईत गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला झालेल्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त आज देशभर शहिदांना सलाम करण्यात आला. संसदेपासून क्रिकेटच्या मैदानापर्यंत सर्वांनी शहिदांची आठवण जागवली.

लोकसभेत गुरूवारी मुंबई हल्ल्यात मारल्या गेलेल्या निरपराधांसाठी दोन मिनिटाचे मौन पाळण्यात आले. संसदेत रक्तदान शिबिरही झाले. त्यात अनेक राजकीय नेत्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवरही रक्तदानासाठी मोठी रांग लागली होती.

कानपूरमध्ये सुरू असलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या दुसर्‍या क्रिकेट कसोटीतही भारतीय संघाने दोन मिनिटांचे मौन पाळून शहिदांना आदरांजली अर्पित केली. यावेळी ग्रीन पार्क स्टेडियमवर शहिदांच्या स्मृती जागविणारे बॅनर्सही दिसत होते.

उत्तर प्रदेश क्रिकेट संघाने गुरूवारी पन्नास अनाथ मुलांना हा सामना मोफत पाहण्याची संधी दिली. तत्पूर्वी या मुलांनी सकाळी नऊ वाजता हातात मेणबत्ती घेऊन संचलन केले.

वाळू शिल्पांसाठी प्रसिद्ध असलेल्या ओरिसाच्या सुदर्शन पटनायकने भुवनेश्वमध्ये वाळूच्या माध्यमाने शिल्प तयार करून मुंबई हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पित केली. मुंबईच्या ताज हॉटेलची सात फूट उंच प्रतिकृती त्याने तयार केली असून दहशतवादाला रोखा असा संदेश त्यावर दिला आहे.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

Show comments