Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दहशतवादाशी लढण्यास शासन सज्ज- मुख्यमंत्री

वेबदुनिया
गुरूवार, 26 नोव्हेंबर 2009 (18:53 IST)
दहशतवादाशी लढण्यास राज्य शासन सज्ज असून त्यासाठी आवश्यक यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी इंडियन मर्चंटस् चेंबर्सतर्फे आयोजित श्रध्दांजलीपर कार्यक्रमात केले.

चर्चगेट येथील सदर संस्थेच्या कार्यालयात हा कार्य़क्रम झाला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतिफलकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी अनावरण करण्यात आले.

मुंबईवरील हल्ल्याचा दिवस अतिशय दुर्दैवी होता, असे उद्गार काढून श्री. चव्हाण म्हणाले, या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पोलीस अधिकारी, जवान आणि नागरिकांचे बलिदान आपण कधीही विसरू शकत नाही. गेल्या वर्षभराच्या कालावधीत मुंबई आणि राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

दहशतवाद आज जागतिक समस्या झाली आहे. दहशतवादाशी लढताना राज्य आणि अवघ्या देशातील जनतेने दाखविलेली एकजूट अतिशय महत्त्वाची आहे, असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त डी. शिवानंदन, इंडियन मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष गूल कृपलानी, उपाध्यक्ष दिलीप दांडेकर, मर्चंटस् चेंबर्सचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

Show comments