Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गणेश विसर्जनाच्या दिवशी गणपतीला पाण्यातच विसर्जन का करतात, जाणून घेऊ या..

Webdunia
सोमवार, 31 ऑगस्ट 2020 (13:04 IST)
गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटा माटाने साजरा केला जातो. या दिवशी सर्व आपापल्या घरातच आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करतात. अश्या परिस्थितीत आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल की गणेश चतुर्थी नंतर हा उत्सव 10 दिवस साजरा करण्यात येतो आणि त्यानंतर गणेशाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी पाण्यात विसर्जित केले जाते. इथे आपणांस सांगू इच्छितो आहोत की यंदा बाप्पांना विसर्जित करण्याचा दिवस अनंत चतुर्दशी 1 सप्टेंबर रोजी आहे. तर जाणून घेऊ की बाप्पाला  पाण्यातच विसर्जित का करतात. होय, त्यामागे एक पौराणिक कथा आहे, तीच आज आम्ही आपणांस सांगणार आहोत..

जेव्हा ऋषी वेदव्यासजींनी संपूर्ण महाभारत बघून आपल्यात आत्मसात केले, पण ते काही लिहू शकत नव्हते. म्हणून त्यांना अशाची गरज होती जे न थांबता संपूर्ण महाभारत लिहू शकेल. मग त्यांनी ब्रह्माजींना विनवणी केली. ब्रह्माजीने त्यांना सांगितले की गणपती बुद्धीचे दैवत आहे ते आपणांस नक्कीच मदत करतील. मग त्यांनी गणेशाला महाभारत लिहिण्याची विनवणी केली. गणपती बाप्पाला लेखनात कौशल्य आहे, त्यांनी महाभारत लिहिण्यास होकार दिला. ऋषी वेदव्यासाने चतुर्थीच्या दिवसापासून अखंड दहा दिवसापर्यंत महाभारताचे संपूर्ण वर्णन गणेशाला ऐकवले ज्याला गणपतीने तंतोतंत संपूर्ण लिहिले.

श्रीकृष्णाने सांगितले होते अनंत चतुर्दशीचे महत्त्व...

महाभारत पूर्ण झाल्यावर वेदव्यासजींनी डोळे उघडल्यावर बघितले की गणपतीच्या शरीराचे तापमान खूप जास्त झाले असे. त्यांचा शरीराच्या तापमानाला कमी करण्यासाठी वेदव्यासजीने गणेशाच्या शरीराला मातीचा लेप लावला, माती सुकल्यावर त्यांचे शरीर ताठरले आणि माती पडू लागली मग महर्षी वेदव्यासांनी गणेशाला तलावात नेऊन मातीचे लेप स्वच्छ केले. कथेनुसार जडीवाशी गणेशाने महाभारत लिहिण्यास सुरुवात केली तो दिवस भाद्रपदातील शुक्ल पक्षाची चतुर्थीचा असे, आणि ज्या दिवशी महाभारताची सांगता झाली तो दिवस अनंत चतुर्दशीचा असे. तेव्हा पासून दहा दिवस गणपतीची स्थापना करण्यात येते आणि 11 व्या दिवशी गणेश उत्सवानंतर बाप्पाचे विसर्जन केले जाते.

संबंधित माहिती

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments