Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुणी पती मिळण्यासाठी करा हे व्रत...

Webdunia
आपल्या धर्मात एक असे ही व्रत आहे जे भक्तिभावाने व निष्ठेने केल्यास गुणी, सुरेख पती लाभतो. हे व्रत केल्याने अखंड सौभाग्य व संतती लाभते. भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका हे व्रत केले जाते. हा सण खास करून कुमारिकांसाठी आहे. तसेच विवाहित स्त्रिया हे व्रत करतात.
हरतालिका विशेष : अखंड सौभाग्यप्राप्तीचे व्रत
या दिवशी मुली व सुवासिनी सुवासिक तेल लावून स्नान करतात. स्नान केल्यानंतर नदीतील वाळू आणून तीन शिवलिंगे करून भक्तिपूर्वक पूजा करतात, अगर शहरांतून सखीसह पार्वतीच्या मातीच्या प्रतिमा व शिवलिंगे मिळतात, ती आणून पूजा करतात. सर्व दिवसभर कडक उपोषण करून पाणीही पिऊ नये अशी रूढी आहे. मात्र ज्यांना सहन होत नाही ते फलाहार करतात पण आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. रात्री जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून बारानंतर रुईच्या पानावर दही घालून ते चाटतात. दुसरे दिवशी सकाळी उत्तरपूजा करून ती लिंगे विसर्जन करतात.
 
काही लोकं हा पण विचार करतात की विवाह झाल्यानंतर मनासारखा पती मिळाल्यावर हे व्रत का करावे? पण एकदा घेतलेले शंकराचे व्रत मोडू नये अशी श्रद्धा असल्यामुळे महिला हे व्रत आजन्म करतात.
कहाणी हरितालिकेची
आधुनिक काळात या व्रतापासून शिकण्यासारखे म्हणजे की फक्त संपत्ती आणि ऐश्वर्य पाहून लग्नाचा निर्णय न घेता समोरच्याचे गुण आणि कर्तृत्वही पाहिले पाहिजे.

रविवारी या प्रकारे सूर्यदेवाची पूजा करा, सर्व दुःख दूर होतील

रविवारी करा आरती सूर्याची

श्री जोतिबा चालीसा Jotiba Chalisa

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

कोणाला स्वर्गात खाण्यासाठी काही मिळत नाही?

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

पुढील लेख
Show comments