Festival Posters

का साजरा करतात महालक्ष्मीचा उत्सव?

Webdunia
भाद्रपद शुक्ल पक्षात महालक्ष्मीचा उत्सवही साजरा केला जातो. गणपतीच्या आगमनानंतर तीन दिवसांनी यांचे आगमन होते. दुसर्‍या दिवशी त्यांची पूजा केली जाते आणि पुरण पोळीचा नैवेद्य दाखविला जातो. तिसर्‍या दिवशी त्यांचे विसर्जन केले जाते. पण काही लोकं हा प्रश्न पडतो की ज्येष्ठागौरी हा सण साजरा करण्यामागे कारण काय? तर ऐका त्यामागे एक कथा आहे... 
 
वर्षोंनुपूर्वी कोलासुर नावाचा एक राक्षस स्त्रियांना फार त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून स्त्रिया एकत्र झाल्या व त्यांनी ब्रह्मा, विष्णू, आणि महेश यांना प्रार्थना केली. त्यांनी या तीनही देवांना आपल्यावर आलेल्या संकटाची जाणीव करून दिली. त्यांचे संकट पाहून देवांनी हे काम विष्णूंची पत्नी महालक्ष्मी हिच्याकडे सोपविले. तेव्हा महालक्ष्मी हिने कोलासुराशी युद्ध केले व त्याचा नाश केला. महालक्ष्मी हिच्या कृपेने स्त्रिया संकटमुक्त होऊन सुखी झाल्या. देवीच्या त्या उपकाराचे स्मरण म्हणूनच महालक्ष्मी उत्सव साजरा केला जातो.

स्त्रिया मोठ्या आनंदाने गौरीची स्थापना करून त्यांना सजवतात. पक्वान्न तयार करतात. आणि सुख-समृद्धी आणि घरात भरभराटीची येवो अशी प्रार्थना करतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Basaveshwar Jayanti 2026 महात्मा बसवेश्वर: ८०० वर्षांपूर्वी 'लोकशाही' मांडणारा क्रांतीसुर्य!

Vinayak Chaturthi 2026 विनायक चतुर्थीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?

नमश्शिवाय भुजंगम् Namashivaya Bhujangam

Mahadev Mantra महादेवाचे मंत्र सोमवारी नक्की जपावे

Mahadev Aarti शंकराची आरती : लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

पुढील लेख
Show comments