Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोहन रावले स्वगृही परतले;राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

Webdunia
बुधवार, 16 एप्रिल 2014 (11:34 IST)
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर केलेल्या हकालपट्टी करण्‍याचे आल्याने राष्ट्रवादीत गेलेले माजी खासदार मोहन रावले पुन्हा स्वगृही अर्थात शिवसेनेत परतले आहे. शिवसेना माझा प्राण असून भगव्या झेंड्याशिवाय राहु शकत नसल्याचे रावले यांनी गिरगाव येथील सभेत सांगितले. शरद पवार यांच्यावर नाराज होऊन परत आलेलो नसल्याचेही रावलेंनी यावेळी स्पष्ट केले.

मोहन रावले म्हणाले, शिवसेनेत परत येत असताना पवारांना फोन केला आणि शिवसेना माझा प्राण आहे, भगव्या झेंड्याशिवाय मी राहू शकत नाही असे सांगितले. पवारांनीही कोणतीही हरकत न दर्शवता माझा मार्ग मोकळा केला. अरविंद सावंत यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची जाहीर सभा घेण्‍यात आली यावेळी रावले यांनी शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला.

दरम्यान, शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यांनंतर रावले मनसेत जातील, असे अंदाज बांधले जात होते. मात्र, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत मोहन रावले यांनी गेल्या 21 मार्चला अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मात्र अवघ्या महिनाभरातच रावले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्‍ठी दिली.

मोहन रावले हे बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात. शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी तब्बल पाच वेळा दक्षिण मध्य मुंबईतून खासदारकी मिळवली होती. मात्र गेल्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

Show comments