Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'वरूण गांधींनी कुटुंबांचा विश्वासघात केला'

Webdunia
बुधवार, 16 एप्रिल 2014 (13:10 IST)
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आणि अमेठीचे उमदेवार राहुल गांधी यांच्यापेक्षा त्यांची बहीण प्रियांका गांधी या आक्रमक दिसत आहेत. प्रियांका गांधी आणि चुलत भाऊ वरूण गांधी यांच्यातील वाकयुद्ध आता टोकाला गेले आहे.

कारण वरुण गांधींनी आपल्या कुटुंबाचा विश्वासघात केला, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे. प्रियांका गांधी अमेठीतील सभेत बोलत होत्या.

प्रियांका गांधी म्हणाल्या, निवडणूक ही कौटुंबिक चहा पार्टी नसून तत्वांची लढाई आहे. आपल्या वडिलांनी देशासाठी बलिदान दिले.

तसेच आपल्या मुलाने अशाप्रकारची चूक केली असती तर आपण त्याला कधीही माफ केले नसते, अशा शब्दात त्यांनी मनेका गांधी यांच्यावरही निशाणा साधला.

प्रियांका गांधी यांनी यापूर्वी टीका करताना म्हटले होतं, 'वरुण आपला भाऊ असला तरीही रस्ता भरटकला आहे आणि त्याला जनताच रस्ता दाखवेल, यावर वरुणच्या आई मनेका गांधी प्रियांका गांधी यांना चोख उत्तर दिल होते. मनेका गांधी यांनी प्रियांका गांधी यांना उत्तर देतांना म्हटले होते, की 'जनताच ठरवेल कोण रस्ता भटकलं आहे'.

प्रियांका गांधी यांच्या वक्तव्यावर वरूण गांधी यांनी ही उत्तर दिले आहे की, 'मी कधीही लक्ष्मणरेषा ओलांडली नाही. माझा मार्ग हा देशाचा मार्ग आहे. वैयक्तिक आरोप करण्यापेक्षा मुद्दयांचे राजकारण करावे. वरूण गांधीनी सुलतानपूर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ही टीका केली आहे.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

Show comments