Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

2002 साली दंगेखोरांना ‘धडा शिकवला’- अमित शाह

Webdunia
शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 (09:44 IST)
गुजरातमध्ये पूर्वी झालेल्या जातीय दंगलींमध्ये समाजकंटकांचा सहभाग होता आणि काँग्रेसने ही सवय लागू दिली होती. मात्र, 2002 मध्ये दंगेखोरांना ‘धडा शिकवल्यानंतर’ गुन्हेगारांनी कारवाया थांबवल्या आणि भाजपने राज्यात ‘कायमस्वरूपी शांतता’ प्रस्थापित केली, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केले. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
 
गुजरातमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्त शहा यांनी खेडा जिल्ह्यातील महुधामध्ये प्रचारासाठी फेरी काढली.
 
यावेळी ते म्हणाले की, “गुजरातमध्ये काँग्रेसच्या कार्यकाळात वारंवार जातीय दंगली झाल्या. काँग्रेस पक्ष विविध गट आणि जातींमधील लोकांना एकमेकांविरोधात उभे करत होता. काँग्रेसने दंगलींच्या माध्यमातून ‘व्होट बँक’ मजबूत केली होती.”
 
2001 साली नरेंद्र मोदी (गुजरातमध्ये) सत्तेत आले आणि 2002नंतर कुठेही संचारबंदी लावण्याची गरज उरली नाही. सर्वजण जागेवर आले. आता कुठे माफिया आहेत? कुठे गुंड आहेत?, असा सवालही अमित शाह यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, “फेब्रुवारी 2002 मध्ये गोध्रा रेल्वे जळितकांडानंतर गुजरातमध्ये मोठय़ा प्रमाणात हिंसाचार उसळला होता. 2004 ते 2014 या काँग्रेसच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात 12 लाख कोटी रुपयांचे घोटाळे झाले. काँग्रेसवासियांनी त्यांची घरे पैशांनी भरली. गरिबी हटवण्याऐवजी त्यांनी गरिबांनाच हटवले.”

Published By- Priya Dixit 

संबंधित माहिती

महिला PSI ने केस बंद करण्यासाठी लाच मध्ये मागितला मोबाईल, नकली फोन घेऊन पोहचले ACB ऑफिसर

मी घाबरत नाही, नवनीत राणा म्हणाल्या जो कोणी पाकिस्तानसाठी काम करतो त्याला मी उत्तर देईन

शिवसेना(युबीटी)च्या रॅलीमध्ये होता1993 चा मुंबई बॉंम्ब स्फोटचा आरोपी, भाजपचा मोठा आरोप

मणिशंकर अय्यरचे पाकिस्तान प्रेम, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये वाढली समस्या

निवडणूक महत्वाचे काम आहे तर कायद्याचे पालन होणार नाही का? मुंबई हाय कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न

Gold-Silver Price Update: अक्षय्य तृतीयापूर्वी सोनं झालं स्वस्त!

Russia-ukraine war : रशिया-युक्रेन संघर्षात श्रीलंकेच्या आठ सैनिकांचा मृत्यू

उपांत्यपूर्व फेरीत मनिका बत्रा जपानच्या हिना हयाता कडून पराभूत

IND W vs BAN W: भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पाचव्या सामन्यात 21 धावांनी पराभव केला

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रूने संप मागे घेतला

पुढील लेख
Show comments