rashifal-2026

2002 साली दंगेखोरांना ‘धडा शिकवला’- अमित शाह

Webdunia
शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 (09:44 IST)
गुजरातमध्ये पूर्वी झालेल्या जातीय दंगलींमध्ये समाजकंटकांचा सहभाग होता आणि काँग्रेसने ही सवय लागू दिली होती. मात्र, 2002 मध्ये दंगेखोरांना ‘धडा शिकवल्यानंतर’ गुन्हेगारांनी कारवाया थांबवल्या आणि भाजपने राज्यात ‘कायमस्वरूपी शांतता’ प्रस्थापित केली, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केले. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
 
गुजरातमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्त शहा यांनी खेडा जिल्ह्यातील महुधामध्ये प्रचारासाठी फेरी काढली.
 
यावेळी ते म्हणाले की, “गुजरातमध्ये काँग्रेसच्या कार्यकाळात वारंवार जातीय दंगली झाल्या. काँग्रेस पक्ष विविध गट आणि जातींमधील लोकांना एकमेकांविरोधात उभे करत होता. काँग्रेसने दंगलींच्या माध्यमातून ‘व्होट बँक’ मजबूत केली होती.”
 
2001 साली नरेंद्र मोदी (गुजरातमध्ये) सत्तेत आले आणि 2002नंतर कुठेही संचारबंदी लावण्याची गरज उरली नाही. सर्वजण जागेवर आले. आता कुठे माफिया आहेत? कुठे गुंड आहेत?, असा सवालही अमित शाह यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, “फेब्रुवारी 2002 मध्ये गोध्रा रेल्वे जळितकांडानंतर गुजरातमध्ये मोठय़ा प्रमाणात हिंसाचार उसळला होता. 2004 ते 2014 या काँग्रेसच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात 12 लाख कोटी रुपयांचे घोटाळे झाले. काँग्रेसवासियांनी त्यांची घरे पैशांनी भरली. गरिबी हटवण्याऐवजी त्यांनी गरिबांनाच हटवले.”

Published By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार?

पुणे विमानतळावर इंडिगोच्या 32 उड्डाणे रद्द, शेकडो प्रवासी अडकले

गोंदियातील गौसिया मशिदीने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली

LIVE: उरण मार्गावर अतिरिक्त उपनगरीय रेल्वे सेवांना मंजुरी देण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

केंद्र सरकारने इंडिगो प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले

पुढील लेख
Show comments