Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Guru Purnima 2024 गुरुपौर्णिमा 2024 तिथी मुहूर्त आणि महत्त्व

Webdunia
शनिवार, 22 जून 2024 (14:03 IST)
गुरु आणि शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. सनातन धर्मात गुरूंना देवाचा दर्जा देण्यात आला आहे आणि गुरूंना समर्पित एक प्रसिद्ध सण म्हणजे गुरुपौर्णिमा. हिंदू धर्माबरोबरच बौद्ध आणि जैन धर्माचे लोकही गुरुपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. गुरुपौर्णिमेत गुरु या शब्दाचा अर्थ शिक्षक असा होतो.
 
गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरूंवरील श्रद्धा व्यक्त करतात. हिंदू पंचागानुसार, गुरु पौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी गुरुपूजा विधिवत केली जाते. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचे तर, गुरु ही अशी व्यक्ती आहे जी ज्ञानाची गंगा वाहते आणि आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो.
 
गुरुपौर्णिमा 2024 तिथी आणि मुहूर्त
गुरुपौर्णिमा तिथी: रविवार, 21 जुलै, 2024
पौर्णिमा तिथी सुरुवात : 20 जुलै 2024 रोजी संध्याकाळी 05:59 वाजेपासून
पौर्णिमा तिथी समाप्ती:: 21 जुलै 2024 रोजी दुपारी 03:46 वाजेपर्यंत
 
गुरुपौर्णिमा पजा विधी
गुरुपौर्णिमा या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे दैनंदिन नित्यक्रम पूर्ण केल्यानंतर स्वच्छ कपडे घालावेत.
गंगाजल शिंपडून पूजास्थान शुद्ध केल्यानंतर व्यासजींची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा.
आता व्यासजींच्या चित्रावर ताजी फुले किंवा हार अर्पण करा आणि त्यानंतर आपल्या गुरूकडे जा.
एखाद्याने आपल्या गुरूला सजवलेल्या उंच आसनावर बसवून पुष्पहार अर्पण करावा.
आता वस्त्र, फळे, फुले, हार अर्पण केल्यावर योग्यतेनुसार दक्षिणा देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा.
 
गुरुपौर्णिमेशी संबंधित खास गोष्टी
गुरुपौर्णिमेच्या दिवशी केवळ गुरुच नव्हे, तर कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य जसे की आई-वडील, भाऊ-बहीण इत्यादींनाही गुरुसमान मानले पाहिजे. 
गुरुच्या ज्ञानानेच विद्यार्थ्याला ज्ञान प्राप्त होते आणि त्याच्या ज्ञानानेच अज्ञान आणि अंधकार दूर होतो. 
गुरूची कृपाच शिष्यासाठी ज्ञानवर्धक आणि लाभदायक ठरते. जगाचे सर्व ज्ञान गुरूंच्या आशीर्वादानेच मिळते.
गुरुकडून मंत्र प्राप्त करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. 
या दिवशी शिक्षकांची देखील सेवा करावी, त्यांना मान-सन्मान द्यावा.
 
गुरुपौर्णिमा महत्व
गुरुपौर्णिमा हा सण शिष्यांद्वारे आध्यात्मिक गुरू आणि शैक्षणिक शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो. सर्व गुरु आपल्या शिष्यांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करतात. अध्यात्मिक गुरू नेहमीच शिष्यांना आणि दुःखी लोकांना मदत करत आले आहेत आणि अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत जेव्हा गुरूंनी आपल्या ज्ञानाने अनेक दुःखी लोकांचे प्रश्न सोडवले आहेत. 
 
स्वामी विवेकानंद आणि गुरु नानक हे असे गुरू होते ज्यांनी सदैव जगाच्या कल्याणासाठी कार्य केले. भारताव्यतिरिक्त भूतान आणि नेपाळसारख्या देशांमध्येही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आपल्या देशाची गुरु-शिष्य परंपरा भारतातून इतर देशांमध्ये पसरली आहे. अध्यात्मिक गुरू नेहमीच स्थलांतरावर राहिले आणि या स्थलांतरामुळे भारतातील या परंपरा इतर देशांमध्येही पसरल्या.
 
गुरु पूर्णिमा का सांस्कृतिक महत्व
हिंदू, बौद्ध और जैन संस्कृतियों में गुरुओं को एक विशेष स्थान प्राप्त है। इन धर्मों या संस्कृतियों में अनेक शैक्षणिक और आध्यात्मिक गुरु हुए हैं जिन्हें भगवान के तुल्य माना गया है। स्वामी अभेदानंद, आदिशंकराचार्य, चैतन्य महाप्रभु आदि प्रसिद्ध हिन्दू गुरु थे। यह हजारों गुरुओं में से कुछ ऐसे नाम हैं जिन्होंने आध्यात्मिक रूप से जनमानस की सेवा की, इसके विपरीत अकादमिक-आध्यात्मिक गुरु; ज्ञान और विद्या प्रदान करते है। सभी गुरुओं के प्रति कृतज्ञता व्यक्त करने के लिए "गुरु पूर्णिमा" का त्यौहार मनाया जाता है।
 
महर्षी वेदव्यास आणि गुरुपौर्णिमा यांचा संबंध
वैदिक मान्यतेनुसार, प्राचीन काळी ब्रह्मसूत्र, महाभारत, श्रीमद भागवत आणि अठरा पुराण यांसारख्या साहित्याचे लेखक महर्षि वेदव्यास यांचा जन्म आषाढ पौर्णिमेच्या तिथीला झाला होता, असे मानले जाते, ते ऋषी पराशर यांचे पुत्र होते.
 
धार्मिक ग्रंथांनुसार महर्षी वेदव्यास हे तिन्ही कालखंडातील तज्ञ मानले जातात. कलियुगात धर्माबद्दलची लोकांची आवड कमी होईल हे त्यांना त्यांच्या दिव्य दृष्टीतून कळले होते. धर्मात रस कमी झाल्यामुळे माणसाची देवावरची श्रद्धा कमी होईल, कर्तव्यापासून विचलित होईल आणि त्याचे आयुष्य अल्प होईल. संपूर्ण वेदाचा अभ्यास करणे अशक्य होईल, म्हणून महर्षी व्यासांनी वेदांचे चार भाग केले जेणेकरून कमी बुद्धिमत्ता आणि कमी स्मरणशक्ती असलेल्या लोकांनाही वेदांचा अभ्यास करता येईल.
 
ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांची रचना व्यासजींनी केली. अशाप्रकारे वेदांचे विभाजन केल्यामुळे ते वेद व्यास म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी वैशंपायन, सुमंतुमुनी, पैला आणि जैमिन या आपल्या प्रिय शिष्यांना या चार वेदांचे ज्ञान दिले.
 
महर्षि वेदव्यासजींच्या शिष्यांनी त्यांच्या बुद्धीनुसार चार वेदांना अनेक शाखा आणि उपशाखांमध्ये विभागले. महर्षी व्यास यांनी महाभारताची रचना केली होती. महर्षी व्यासजींना आपले आदिगुरू मानले जाते. गुरुपौर्णिमेचा प्रसिद्ध सण व्यास जयंती म्हणूनही साजरा केला जातो. म्हणून या सणाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात आणि या दिवशी आपण आपल्या गुरुंना व्यास जींचा भाग मानून त्यांची पूजा केली पाहिजे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

वटपौर्णिमा कथा मराठी

वटपौर्णिमेच्या शुभेच्छा Vat Purnima 2024 Wishes In Marathi

वटपौर्णिमा संपूर्ण माहिती Vat Purnima Information In Marathi

25 जून रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी, शुभ मुहूर्त- पूजा विधी आणि अंगारकी चतुर्थी श्लोक

वटपौर्णिमा व्रत करण्याची सोपी विधी

सर्व पहा

नक्की वाचा

भीषण अपघात : झाडाला धडकली बस, 40 जण गंभीर जखमी तर दोन जणांची प्रकृती अस्थिर

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये सीट शेयरिंग वरून बिगडू शकते गोष्ट

'लोकसभा मध्ये कमी सीट वर लढलो, पण विधानसभेमध्ये...', शरद पवारांनी शिवसेना युबीटी आणि काँग्रेसला दिला मोठा संकेत

जागतिक पर्जन्यवन दिन

Kabir Jayanti 2024 : संत कबीर दास भक्ती काळाचे एकमेव कवी

पुढील लेख
Show comments