Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आई पहिली गुरू

Webdunia
आषाढी पौर्णिमा गुरु पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हा आपल्या जीवनात आतापर्यंत जे काही मिळाले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि भविष्यात जे करायचे आहे त्याचा संकल्प सोडण्याचा दिवस आहे. आपल्या जे काही प्राप्त झाले त्याची जाणीव करून त्याबद्दल कृतज्ञता म्हणून हा पर्व साजरा करावा.
 
पण या सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली आई. कारण आपल्या जीवनात आपली आई ही सर्वात पहिली गुरु आहे. कारण अगदी गर्भ संस्कारापासूनच शिक्षणाची सुरुवात होते. आपले अपत्य आदर्श सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व बनावे यासाठी आई आपले सर्वस्व पणाला लावून अविरत कष्ट करत असते. 
आईच्या उच्चारणाने मुलांना भाषेचं ज्ञान होतं. लहानपणी आईने सांगितलेल्या गोष्टी, दिलेली शिकवण, अनुभव हे मुलांच्या जीवनावर चिरस्थायी प्रभाव सोडतात. लहानपणी दिलेली शिकवण संपूर्ण जीवन त्याचे मार्गदर्शन करत असते.
 
मातृत्वाला पृथ्वीवर देवत्वाचे रूप प्राप्त आहे. आईचे प्रेम म्हणजे परमात्म्याचा प्रकाश आहे. जीवनाला योग्य वळण देण्यासाठी मार्गदर्शन देण्याचे कार्य आईच करते. म्हणूनच आई ही प्रथम गुरुस्थानी आहे. आई ही पहिली गुरु आणि विद्यापीठ आहे. त्यानंतर शिक्षक, आणि आध्यात्मिक गुरू. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुसह आईच्या पूजनाचे महत्त्व आहे.

संबंधित माहिती

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments