सूर्य आपल्याला केवळ प्रकाशच देतो असे नाही, तर आपण आहोत त्याला बऱ्याच अंशी सूर्य कारणीभूत आहे. म्हणूनच या सहस्त्ररश्मीबद्दल कृतज्ञताभाव त्याची पूजा करून व्यक्त केला पाहिजे. त्यासाठी रोज सूर्योदयापूर्वी स्नानादी कार्ये आटोपली पाहिजेत. सूर्योदय झाल्यानंतर त्या भास्कराच्या समोर नतमस्तक होऊन डोळे मिटून त्याची प्रार्थना करा. जे तत्व सूर्यात आहे, ते माझ्यातही आहे, असे म्हणून डोळे उघडा. त्यानंतर खालील मंत्र म्हणा.
अशा प्रकारे सूर्याची पूजा- अर्चना केल्याने बरेच लाभ होतात. त्याच्या कोवळ्या प्रकाशाच्या माध्यमातून डी जीवनसत्व आपल्याला मिळते. शिवाय त्याच्या पराक्रमी रूपाकडे पाहून आपल्यात चेतना संचारते.
रोज सकाळी तांब्याच्या लोटीमध्ये शुद्ध पाणी घ्या. त्यानंतर सूर्याच्या समोर उभे राहून दोन्ही हातांनी लोट्याला उंच उचलून सूर्याला अर्घ्य अर्पण करा. म्हणजे त्यातील पाणी काली सोडून द्या. अर्घ्याच्या पाण्यात लाल फुले, अक्षता, कुंकू हेही टाकावे. अर्घ्य वाहताना खालील मंत्र म्हणून संकल्प सोडावा.