Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोठ्यांचे चरणस्पर्श करणे नेहमीच फायदेशीर

Webdunia
शुक्रवार, 27 मार्च 2015 (16:09 IST)
वयाने, मानाने थोर असणार्‍या व्यक्तींचे पाया पडण्याची रीत फार पूर्वीपासून आहे. सनातन धर्मांप्रमाणे मोठ्यांप्रती आदर दर्शविण्यासाठी चरणस्पर्श करणे उत्तम मानले जाते. चरणस्पर्शाचे मानसशास्त्रीय तसंच वैज्ञानिक कारणंही आहेत.
 
1. वाकून पाया पडण्याने विनम्रता येते आणि मनाला शांतीदेखील मिळते.
2. पाया पडल्यावर मोठे व्यक्ती आशीर्वाद देण्यासाठी त्यांचा हात आमच्या डोक्यावर स्पर्श करतात. या प्रकारे त्या पूजनीय व्यक्तींची सकारात्मक ऊर्जा आशीर्वादाच्या रूपात आमच्या शरीरात प्रवेश करते आणि आमचा आध्यात्मिक व मानसिक विकास होतो.
3. शास्त्राप्रमाणे दररोज थोर मोठ्यांच्या पाया पडण्याने दीर्घ आयुष्य व उच्च शिक्षण प्राप्त होतं आणि प्रसिद्धीत वाढ होते.
4. शरीरात उत्तर ध्रुव म्हणजे डोक्यातून सकारात्मक ऊर्जा प्रवेश करून दक्षिण ध्रुव म्हणजे पायाकडे प्रवाहित होते. आणि पायात ही ऊर्जा अमर्यादित प्रमाणात स्थिर होऊन जाते. म्हणूनच पायाला हात लावून नमस्कार केल्याने ही ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते.
5. असा विश्वास आहे की पायाच्या अंगठ्याहून सुद्धा शक्तीचा संचार होतो.
6. असे म्हणतात की थोर मोठ्यांच्या नियमित पाया पडल्याने प्रतिकूल ग्रहदेखील अनुकूल होऊन जातात.
7. वाकून पाया पडणे हा एकाप्रकारे शारीरिक व्यायामदेखील आहेत. वाकून नमस्कार करणे, गुडघ्यावर बसून नमस्कार करणे किंवा साष्टांग दंडवत घातल्याने शरीर लवचिक होतं.
8. नमस्कार करताना पुढे वाकल्याने डोक्यात रक्त प्रवाह वाढतो जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
9. वाकून नमस्कार करण्याने आमच्यातला अहंकारदेखील कमी होतो.
10. काही लक्ष्य ठेवून मोठ्यांच्या पाया पडल्याने लक्ष्य प्राप्तीसाठी बळ मिळतं.
 
यामुळेच लहान मुलांना मोठ्यांच्या पाया पडण्याचे नियम आणि संस्कार दिले जातात. पण इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे 
 
की त्या व्यक्तींचेच चरणस्पर्श केले पाहिजे ज्यांचे आचरण योग्य असेल.

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

Show comments