Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

समर्थ रामदास स्वामी

Webdunia
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2016 (11:21 IST)
महाराष्ट्रातील संत कवी व समर्थ संप्रदाचे संस्थापक समर्थ रामदास यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म एप्रिल 1608 मध्ये जालना जिल्ह्यातील जांब येथे चैत्र शुद्ध नवमीस (रामनवमी) झाला. त्यांचे मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याजी तर आईचे नाव राणूबाई होते. त्यांचे मोठे भाऊ गंगाधर हे विद्वान होते. वयाच्या बाराव्या वर्षी स्वत:च्या विवाहाच्यावेळी ‘सावधान’शब्द ऐकताच रामदासांनी तेथून पलान केले. नाशिकमध्ये टाकळी येथे त्यांनी 12 वर्षे रामनामाचा जप करीत तपशर्च्या केली. त्यानंतर 12 वर्षे संपूर्ण भारत भ्रमण केले. त्यांची विपुल रचना प्रसिद्ध असून ‘मनाचे श्लोक’आणि ‘दासबोध’ हे त्यांचे दोन प्रमुख ग्रंथ आहेत. 
 
रामाला व हनुमंताला उपास्य दैवत मानणार्‍या रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन आणि संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. धर्मकारणात जाणीवपूर्वक राजकारण अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होत. गावोगावी राम आणि हनुमान यांची मंदिरे स्थापन करून त्यांनी व्यायाम आणि स्वधर्म निष्ठेचा प्रसार केला. अनेक शिष्य जमवून मठ स्थापन केले. त्यामधून समाजात स्वाभिमान जागृत केला. 2 फेब्रुवारी 1681 मध्ये सज्जनगड जिल्हा सातारा येथे त्यांचे निर्वाण झाले.

Maa lakshmi : देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुळशीला या 5 वस्तू अर्पण करा

Sita Navami 2024: आज सीता नवमीचे व्रत केल्याने मिळेल मातृत्व

श्री सीता चालीसा : सीता नवमी या एका उपायाने प्रसन्न होईल देवी

Brihaspativar upay गुरुवारी काय करावे काय नाही जाणून घ्या

आरती गुरुवारची

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवित हानी नाही

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

Show comments