Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अग्नि पंचक: जर तुम्हाला पंचकात काही काम करायचे असेल तर तुम्ही उपाय करू शकता

अग्नि पंचक: जर तुम्हाला पंचकात काही काम करायचे असेल तर तुम्ही उपाय करू शकता
, मंगळवार, 1 जून 2021 (10:15 IST)
ज्योतिष शास्त्रात शुभ-अशुभ मुहूर्तांच्या विषयात वेग वेगळ्या मान्यता आहे. हिंदू धर्मात कुठले ही शुभ कार्य करण्याअगोदर शुभ-अशुभ मुहूर्तांबद्दल अवश्य विचार केला जातो. ज्योतिषीप्रमाणे, काही नक्षत्रांमध्ये शुभ कार्य करणे फारच उत्तम मानण्यात येते. तसेच काही नक्षत्रांमध्ये एखादे विशेष कार्य करण्याची मनाई असते. धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती देखील अशाच नक्षत्रांचा समूह आहे. धनिष्ठाच्या प्रारंभापासून रेवती नक्षत्राच्या शेवटापर्यंतचा काळ पंचक असतो. यावेळी अग्नि पंचक मंगळवार, 01 जून 2021 पासून सुरू होईल, जो 05 जूनपर्यंत चालेल. जर तुम्हाला पंचकात काही काम करायचे असेल तर तुम्ही उपाययोजना करू शकता.
 
पंचकात काही शुभ काम केले जातात याची माहिती या प्रकारे आहे- 
 
पंचकात येणारे नक्षत्रांमध्ये शुभ कार्य होऊ शकतात. पंचकात येणारा उत्तराभाद्रपदा नक्षत्र वारासोबत मिळून सर्वार्थसिद्धि योग निर्माण करतो, तसेच धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद व रेवती नक्षत्र प्रवास, व्यापार, जावळ इत्यादी शुभ कार्यांमध्ये श्रेष्ठ मानण्यात आले आहे.  
 
ज्योतिष्यात पंचकाला भले अशुभ मानले गेले आहे, पण या दरम्यान साखरपुडा, लग्न इत्यादी कार्य केले जातात. पंचकात येणारे तीन नक्षत्र पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद व रेवती रविवारी असल्यामुळे आनंद इत्यादी 28 योगांमधून 3 शुभ योग बनवतात, हे शुभ योग या प्रकारे आहे - चर, स्थिर व प्रवर्ध. या शुभ योगांमुळे यश व धन लाभाचा विचार करण्यात येतो.
 
नक्षत्रांचा प्रभाव आणि पंचकाच्या दरम्यान कोणते 5 काम करणे निषेध आहे -
 
1. पंचकात जेव्हा घनिष्ठा नक्षत्र असेल तेव्हा गवत, लाकूड इत्यादी इंधन एकत्रित नाही करायला पाहिजे, याने अग्नीची भिती असते.  
2. पंचकाच्या दरम्यान दक्षिण दिशेत प्रवास करणे टाळावे, कारण दक्षिण दिशा, यमाची दिशा असते. या नक्षत्रांमध्ये प्रवास करणे धोकादायक ठरू शकते.  
3. पंचकात जेव्हा रेवती नक्षत्र सुरू असेल त्या वेळेस घराची छत नाही टाकायला पाहिजे, असे विद्वानांचे मत आहे. यामुळे धन हानी आणि  घरात क्लेश होतो.  
4. पंचकात पलंग तयार करणे देखील अशुभ मानले जाते. विद्वानांनुसार असे केल्याने फार मोठ्या संकट समोर येण्याची शक्यता आहे.  
5. पंचकात शवाचे अंतिम संस्कार करण्याअगोदर एखाद्या योग्य ब्राह्मणाचा सल्ला घ्यायला पाहिजे. जर असे नाही केले तर शवासोबत पाच पुतळे कणकेचे किंवा कुश (एक प्रकारचे गवत)ने बनवून अर्थीवर ठेवायला पाहिजे आणि या पाचींचे शवाप्रमाणे पूर्ण विधीने अंतिम संस्कार करायला पाहिजे, तेव्हा पंचक दोष समाप्त होतो. असे गरूड पुराणात लिहिले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुळशीचे 5 नियम: तुळशीच्या पाच सेवा कोणत्या