Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अन्न- संस्कार

Webdunia
आयुर्वेदानुसार अन्नातील उपयुक्त आवश्यक चवी..
मधुर, तिक्त, कषाय, लवण इ मुख्य
भोजन बनवणारी व वाढणारी व्यक्ती..
•आप्त- स्वकीय आपुलकी प्रेम जिव्हाळा असलेली
•तृप्त- प्रसन्न स्वतः नेहमी आनंदी असणारी
•युक्त - भोजनशास्त्र व वाढप कलेत कौशल्य असणारी व मायेने परिपूर्ण
•मुक्त - षड्रिपूंपासून दूर, निरोगी, स्वस्थ शरीर व मनाची अशी असावी..
 
अन्नपदार्थांचे प्रकार..
भक्ष्य, भोज, लेह्य, चोष्य..
दातांनी चावून, जिभेने चाटून, ओठांनी ओढून व चाखून गिळून घेण्याचे पदार्थ असावेत..
 
भोजन ताट-पान वाढण्याची व अन्नग्रहणाची शास्त्रोक्त पद्धत..
• शुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ वाढावे..
• त्याच्या डावीकडे लिंबू व क्रमाने चटणी कोशिंबीर-सलाड-रायते पैकी एक (ऋतूनुसार उपलब्ध पदार्थांचे), 
• तळण- भजी, सांडगे, पापड, कुरडई इ( सणवारी ऋतूनुसार) इतके वाढावे..
• सामान्यतः उजव्या हाताने जेवतात; त्यामुळे जे पदार्थ कमी खायचे ते तोंडी लावण्याचे चाटून खायचे पदार्थ डावीकडे वाढावेत. स्वाभाविकता मनुष्य उजव्या हाताने खाताना डावीकडचे पदार्थ कमी खातो.
• याचवेळी भोजनमंत्र सुरू करावा. येथपर्यंत आम्लयुक्त आंबट व तुरट पदार्थामुळे जिव्हेवरची लाळ सुटायला प्रारंभ होतो. ज्यामुळे अन्न पचनास सुलभता येते. मोठ्याने भोजनमंत्र म्हटल्याने त्या आघाताने टाळू व कंठातील ग्रंथी स्रवायला लागतात. मुखातून चावून बारीक झालेल्या अन्नाच्या तुकडे यामुळे अन्ननलिकेत सहज ढकलले जातात.
• यानंतर भोजनकर्त्याच्या समोर ताटाच्या मध्यभागी खालच्या बाजूस जड पदार्थ (चपाती पोळी भाकरी इ) वाढावा. 
• उपवास सोडायला बसलो असू तर प्रथम तिथेच वरणभात वाढावा. जो सहजपाच्य आहे आणि कर्बोदके व प्रथिने दोन्ही पुरवतो.
• उजवीकडे मुख्य सुकी व रस्साभाजी वाढावी. जी सर्वात जास्त ग्रहण करायचे व्यंजन आहे. यात तेल मसाले कमी असावेत व मूळ स्वभावात स्वाद असावा.
• वर मिठाच्या उजवीकडे आमटी (द्रव) व मध्ये गोड पदार्थ (जर सणाचे जेवण असेल तर) वाढावेत. हे भाजीच्या बरोबरीच्या प्रमाणात घ्यावेत. अशा पदार्थांमुळे कर्ब प्रथिने स्निग्ध खनिजे इ व जीवनसत्त्वयुक्त अन्नाची गरज पूर्ण होते.
• डावीकडे (इतर अन्नापेक्षा कमी प्यावे म्हणून) पेल्यात पाऊण भरेल एवढेच पाणी शेवटी वाढावे. या क्रमाने वाढल्याने एक चक्र पूर्ण होते.
• येथपर्यंत भोजन मंत्र संपला पाहिजे. तोपर्यंत अन्ननलिकेतून खाली जठर आतडे यकृतापर्यंत संदेश पोचतो की त्यांनी क्रियाशील व्हायचे आहे. ते ग्रहणासाठी तयार राहतात.
• यानंतर जेवणार्‍याने चित्राहुती घालावी. (या क्रियेत व वैश्वदेव इ मध्ये सृष्टीच्या कल्याणाची कामना असते. याविषयी नंतर सविस्तर पाहू.)
• मग अन्न ग्रहण करण्यास आरंभ करावा.
• पहिला घास घेऊन चावून चोथा करून अन्ननलिकेकडे ढकलावा व दुसरा घास घ्यावा. तो आनंदाने मनःपूर्वक चावून रसना तृप्त होईपर्यंत पहिला घास चावला जाऊन तो जठरात साचतो. तिथून नंतर आतड्यातून खाली रस व मल विभक्त होवून सरकतो.
• अशी भोजनप्रक्रिया ही शरीर व मनोविज्ञान शास्त्र अनुकूल असून मानवी देह व मनास फलदायी आहे. या प्रक्रियेत केवळ शाकाहारच वेळेच्या नियोजनात बसतो. मांसाहाराला गरजेची आंतर्यंत्रणा मानवी शरीरात नसल्याने तो निषिध्द समजला आहे.
• भोजन पूर्ण करताना पुन्हा धन्यवादाचा मंत्र म्हणून तृप्त मनाने आपोष्णी - तीन वेळा आचमन करून आजूबाजूला पडलेले खरकटे स्वतः गोळा करावे व भोजनास बसलेल्या सर्वानी एकत्र (वडिलधारी मंडळींच्या आधी उठून त्यांचे ताट स्वतः उचलावे) उठावे.
• ताटातील उष्टेखरकटे शक्यतो स्वतः योग्य त्या जागी ठेवून ताटात पाणी घालून विसळून ठेवावे.
• जेवताना शक्यतो अन्नगप्पाच व्हाव्यात. ही भोजन सभ्यता आहे.
 
भोजन मंत्र
प्रारंभी
ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सहवीर्यं करवावहै । तेजस्वि नावधीतमस्तु । मा विद्विषावहै । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।। 
 
अंती
हरिर्दाता हरिर्भोक्ता हरिरन्नं प्रजापतिः | हरिः सर्वशरीरस्थो भुङ्क्ते भोजयते हरिः |
 
• याव्यतिरिक्त पंगतीत वाढप यंत्रणेस वेळ लागतो म्हणून देव देश धर्मस्तुतिचा गजर करावा. अन्नप्रमाण वय व्यवसाय ऋतु बल इ विचार करुन घ्यावे.
 
आसन
• ऋतूनुसार मऊ बैठक असावी
• मांडी घालून बसावे. यामुळे रक्तपुरवठा उदराकडे आवश्यक तितका सरकतो व चयापचय योग्यरित्या घडते.
• शक्यतो हातांच्या बोटांनी ग्रहण करावे. कारण ओठ जिव्हा बोटे यांचे तापमान एकसमान असल्याने आंतर्व्यवस्थेला उचित संदेश पोचतो व लाळ ग्रंथी नेमून दिलेले कार्य न बिचकता करतात.

संबंधित माहिती

11 Maruti Temples समर्थांनी स्थापन केलेले 11 मारुती

Hanuman Jayanti शुभ योग घडत असल्यामुळे या 3 राशींना मिळणार आर्थिक लाभ !

श्री हनूमत् पञ्च चामरम्

हनुमान जयंती प्रसाद इमरती रेसिपी Imarti Recipe

मंगळवारी हनुमान मंत्राचा जाप केल्याने सर्व कष्ट होतील दूर

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

पुढील लेख
Show comments