Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ashadh आषाढ महिन्यात हे शुभ कार्य करा

Webdunia
गुरूवार, 30 जून 2022 (06:13 IST)
स्कंद पुराणानुसार आषाढ महिन्यात एकभुक्त व्रत करावे. म्हणजेच अन्न फक्त एकाच वेळी खावे. असे करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या दरम्यान पावसाळा सुरू होतो, त्यामुळे पचनशक्ती कमी होते. पोटाशी संबंधित आजार जास्त खाल्ल्याने त्रास होऊ शकतो.
 
धार्मिक ग्रंथानुसार आषाढ महिन्यात संत आणि ब्राह्मणांना खटाळ, छत्री, मीठ आणि आवळ्याचे दान करावे. हे दान केल्याने भगवान वामन प्रसन्न होतात. ते भगवान विष्णूचे अवतार मानले जातात. या महिन्यात त्यांची विशेष पूजा करावी.
 
आषाढ महिन्यात सूर्यदेवाची पूजा करण्याचाही नियम आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य अशुभ आहे त्यांनी या महिन्यात गहू, लाल चंदन, गूळ आणि तांब्याचे भांडे लाल कपड्यात ब्राह्मणांना दान करावे. यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात. या महिन्याच्या प्रत्येक रविवारी जेवणात मीठ वापरू नये.
 
आषाढ महिना यज्ञ आणि धार्मिक विधी करण्यासाठी शुभ आहे. वर्षातील 12 महिन्यांमध्ये आषाढ महिना हा एकमेव महिना आहे, ज्यामध्ये यज्ञ केल्याने त्याचे फळ लवकर प्राप्त होते. एवढेच नाही तर यासोबतच जीवनात सुख-समृद्धीचे आगमन होते.
 
जर तुम्हाला तुमच्या कुंडलीत सूर्य आणि मंगळाची स्थिती मजबूत करायची असेल तसेच आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळवायची असेल तर आषाढ महिन्यात श्री हरी विष्णू, भोलेनाथ, माँ दुर्गा आणि हनुमानजींची पूजा करावी. आषाढ महिन्यात त्यांची पूजा करणे विशेष फलदायी असते.
 
आषाढ महिन्यात सूर्योदयापूर्वी उठून काहीही न खाता स्नान करावे व त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. सूर्यदेवाला आरोग्याची देवता म्हटले जाते आणि आषाढ महिन्यात त्यांची पूजा केल्याने मनुष्य अनेक प्रकारच्या शारीरिक त्रासांपासून दूर राहतो.
 
आषाढ महिन्यात अनेक उपवास आणि सण साजरे केले जातात, त्यामुळे हा महिना पूजेसाठी आणखीनच खास आहे. कांदे नवमी, आषाढी एकादशी, वासुदेव द्वादशी, गुरु पौर्णिमा, मौना पंचमी, कामिका एकादशी, दिव्याची आवस सण येत असून या दरम्यान विधीपूर्वक पूजा-व्रत- पाठ केल्यास देव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात.
 
आषाढ महिन्यात स्नानासोबतच दानधर्मालाही विशेष महत्त्व आहे. आपल्या क्षमतेनुसार आषाढ महिन्यात गरजूंना दान आणि दक्षिणा द्या. आषाढ महिन्यात छत्री, आवळा, चप्पल आणि मीठ इत्यादी दान करणे श्रेष्ठ मानले जाते. असे केल्याने भगवान विष्णूची कृपा राहते आणि साधकही भाग्यवान होतो असे म्हणतात.

संबंधित माहिती

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments