suvichar

हे कामं करून लोकं देतात मृत्यूला निमंत्रण

Webdunia
शास्त्रांप्रमाणे व्यक्तीची आयू 100 वर्ष निर्धारित केली गेली आहे. अलीकडे कोणी विरळच या आयूचे सुख प्राप्त करत असतील. महाभारतात वर्णित एका प्रसंगाप्रमाणे राजा धृतराष्ट्र महात्मा विदुर यांना विचारतात की व्यक्तीची आयू कमी होण्याचे काय कारणं आहेत?
तेव्हा विदुर म्हणतात-
 
* नेहमी स्वत:चे कौतुक करणारा, स्वत:ला समजदार समजणारा व्यक्ती गर्विष्ठ असतो. स्वत:ला श्रेष्ठ आणि दुसर्‍यांना लहान समजणार्‍या व्यक्तीचा गर्व त्याची आयू कमी करतं.
 
* अधिक आणि व्यर्थ बोलणारा व्यक्ती अनेकदा असे काही बोलून जातो ज्यामुळे भविष्यात त्याचे नकारात्मक परिणाम झेलावे लागतात. म्हणून अधिक शब्दांचे प्रयोग न करता वाणी संयमित ठेवावी कारण असंयमित वाणीने आयू कमी होते.
 
* क्रोध मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. रागात केलेल्या कामांमुळे त्याला दुख आणि नुकसान झेलावं लागतं. या प्रकाराच्या सवयींमुळे व्यक्तीची आयू कमी होते.

* समाजात सुख आणि शांतीने जीवन व्यतीत करण्यासाठी व्यक्तीमध्ये त्याग आणि समर्पण भाव असला पाहिजे. ज्या लोकांमध्ये त्यागाची भावना नसते त्यांची शीघ्र मृत्यू निश्चित आहे.
 
* शास्त्रांप्रमाणे आपल्या फायद्यासाठी मित्र आणि नातेवाइकांना धोका देणे महापाप मानले आहे. धोका देणार्‍या व्यक्तीची आयू कमी असते.
 
* लोभ आणि स्वार्थाला व्यक्तीचे शत्रू मानले गेले आहे. जी व्यक्ती मनात ही भावना बाळगतात, त्यांची आयू लांब असणे शक्य नाही. लोभी माणूस अधिक दिवस जिवंत राहत नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती सोमवारची

रविवार: या गोष्टी लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा आनंदी राहाल

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारी करा आरती सूर्याची

एकादशी हे व्रत पूर्ण फळदायी व्हावे यासाठी काही विशेष नियम पाळणे आवश्यक मानले जाते

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments