Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Garuda Purana life after death: मृत्यूनंतर किती दिवसांनी दुसरा जन्म होतो?

Webdunia
शनिवार, 16 सप्टेंबर 2023 (04:20 IST)
Garuda Purana life after death: गुरुड पुराणाला महापुराणाचा दर्जा देण्यात आला आहे. गरुड पुराणात जीवन, मृत्यू आणि नंतर आत्म्याचा प्रवास, पुनर्जन्म याबद्दल सांगितले आहे. हिंदू धर्मात, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याचे अंत्यसंस्कार केले जातात, त्यानंतर 13 दिवसांनी तेरावा केला जातो. यासोबतच मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पिंडदान, तर्पण आदी विधी केले जातात. या सर्व विधींचे महत्त्व आणि त्यांची कारणे गरुड पुराणात सांगितली आहेत. यामुळेच 16 संस्कारांमध्ये मृत्यू हा अंतिम संस्कार मानला जातो. आता प्रश्न असा आहे की मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो, पुनर्जन्म झाला तर कधी किंवा किती दिवसांनी. तसेच, आत्म्याचे शेवटच्या प्रवासात काय होते.
 
मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो?
गरुड पुराणानुसार, मृत्यूनंतर आत्मा लांबचा प्रवास करतो. आत्म्याला यमलोकात नेले जाते, जिथे यमराजांसमोर त्याच्या चांगल्या-वाईट कर्मांचा हिशेब दिला जातो. मग याच आधारावर त्याचे पुढील भवितव्य ठरते. जर एखाद्याने वाईट कृत्ये केली असतील तर यमदूत त्याच्या आत्म्याला शिक्षा करतात. दुसरीकडे सत्कर्म करणाऱ्यांच्या आत्म्याचा हा प्रवास सुखकर राहतो. गरुड पुराणानुसार यमराजापर्यंत पोहोचण्यासाठी आत्म्याला सुमारे 86 हजार योजनांचे अंतर पार करावे लागते.
 
असाच पुनर्जन्म ठरवला जातो
गरुड पुराणानुसार, एखाद्या व्यक्तीचा पुनर्जन्म त्याच्या कर्माच्या आधारे निश्चित केला जातो. पापी व्यक्तीच्या आत्म्याला नरकात पाठवले जाते. दुसरीकडे, शुद्ध आणि सद्गुणी जीवाला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते आणि त्याला स्वर्गात स्थान मिळते. जेव्हा माणसाच्या आत्म्याला त्याच्या कर्मानुसार शिक्षा भोगावी लागते तेव्हा त्याला दुसरा जन्म मिळतो. पुढचा जन्म कोणत्या जन्मी मिळणार, हे त्याच्या कर्माच्या आधारे ठरवले जाते. गरुड पुराणानुसार, मृत्यूनंतर 3 दिवसांपासून 40 दिवसांत पुनर्जन्म होतो.

संबंधित माहिती

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments