Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Magh Purnima 2023: माघ पौर्णिमा व्रत महत्त्व, पूजा विधी, कथा संपूर्ण माहिती

Webdunia
रविवार, 5 फेब्रुवारी 2023 (10:46 IST)
सनातन परंपरेत पौर्णिमा तिथीला खूप महत्त्व आहे. त्याहीपेक्षा माघ महिन्याची पौर्णिमा ही व्रत, दान आणि संकल्प यासाठी सर्वोत्तम मानली जाते. जिथे एकीकडे शरद पौर्णिमा हा लक्ष्मीप्राप्तीचा विशेष दिवस असतो, त्याचप्रमाणे माघ महिन्यातील पौर्णिमा हा श्री हरी विष्णूच्या उपासनेचा विशेष दिवस असतो. या तिथीचे स्नान, दान आणि जप हे पुण्यकारक आणि फलदायी असल्याचे सांगितले जाते. माघ पौर्णिमेला माघ स्नानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. माघ महिन्यात गंगेत स्नान, विष्णूची पूजा याचे विशेष महत्त्व आहे.यंदा माघ पौर्णिमा 5 फेब्रुवारी रोजी आहे. 
 
माघ महिन्याचे महत्त्व
माघ महिन्यात चालणारे हे स्नान पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन माघ पौर्णिमेपर्यंत संपते. तीर्थराज प्रयागमध्ये कल्पवास केल्यानंतर त्रिवेणी स्नान करण्याचा शेवटचा दिवस म्हणजे माघ पौर्णिमा. हिंदू मान्यतेनुसार माघ महिन्यात स्नान करणाऱ्या लोकांवर भगवान नीलमाधव प्रसन्न होतात आणि त्यांना सुख, सौभाग्य, धन, संतती आणि मोक्ष देतात. माघ नक्षत्राचा उदय हा माघ पौर्णिमेचा उगम आहे. मघा नक्षत्र हे श्री विष्णूचे हृदय आहे असे म्हटले जाते.
 
माघ पौर्णिमा व्रत आणि उपासना पद्धत
माघ पौर्णिमेला स्नान, दान, हवन, व्रत आणि जप केले जातात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा, पितरांचे श्राद्ध आणि गरीबांना दान द्यावे.
माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी पवित्र नदी, जलाशय किंवा विहीरीवर स्नान करावे. स्नानानंतर सूर्य मंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे.
स्नान केल्यानंतर व्रताच्या संकल्पाने भगवान मधुसूदन अर्थात श्रीकृष्णाची पूजा करावी.
दुपारी गरीब लोकांना आणि ब्राह्मणांना अन्नदान करून दान-दक्षिणा द्यावी.
तीळ आणि काळे तीळ दान करण्याचे विशेष महत्तव सांगितले गेले आहे.
माघ महिन्यात काळ्या तिळाने हवन करावे आणि पितरांची पूजा काळ्या तिळाने करावी.
 
व्रत कथा -
एका पौराणिक कथेनुसार कांतिका नगरात धनेश्वर नावाचा ब्राह्मण राहत होता. दररोज मिळत असलेल्या भिक्षा आणि दान यावर त्याची जीविका सुरु होती. त्याला संतान नव्हती. एकदा त्याची पत्नी भिक्षा मागण्यासाठी नगरात गेली असताना तिला सर्वांनी वांझ म्हणून भिक्षा देण्यास नकार दिला. तेव्हा तिला एकाने 16 दिवस काली देवीची पूजा करण्यास सांगितले. सांगितल्याप्रमाणे पती-पत्नीने तसेच केले. त्यांची भक्ती बघून 16 दिवसांनंतर देवी प्रकट झाली आणि देवीने ब्राह्मणाच्या पत्नीला गर्भवती होण्याचा आशीर्वाद दिला आणि म्हटले की आपल्या सामर्थ्यानुसार प्रत्येक पौर्णिमेला दिवा लावा. याप्रकारे प्रत्येक पौर्णिमेला दिवे वाढवत जावे जोपर्यंत किमान 32 दिवे होत नाही.
 
मग ब्राह्मणाने आपल्याला पत्नीला पूजेसाठी झाडावरुन आंब्याचं कच्चं फळ तोडून दिले आणि पूजा केल्यावर त्याची पत्नी गर्भवती झाली. प्रत्येक पौर्णिमेला देवीने सांगितल्याप्रमाणे ती दिवे लावत होती. देवीच्या कृपेने तिने एक पुत्राला जन्म दिला ज्याचे नाव देवदास असे ठेवले. देवदास मोठ्या झाल्यावर त्याला त्याच्या मामासोबत शिक्षण घेण्यासाठी काशी येथे पा‍ठवले. काशीत असे काही घडले की धोक्याने देवदासाचे विवाह झाले. देवदास म्हणाला की तो अल्पायू आहे तरी बळजबरी त्याचे विवाह केले गेले. जेव्हा देवदासला घेऊन जाण्यासाठी काळ आला तर ब्राह्मण दंपतीने पौर्णिमेचं व्रत केलं होते म्हणून काळ त्याला घेऊन जाण्यात असमर्थ ठरला. तेव्हापासून पौर्णिमा व्रत केल्याने संकट टळतं आणि सर्व इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते.
 
Edited By - Priya Dixit  
 
 
 
 

संबंधित माहिती

11 Maruti Temples समर्थांनी स्थापन केलेले 11 मारुती

Hanuman Jayanti शुभ योग घडत असल्यामुळे या 3 राशींना मिळणार आर्थिक लाभ !

श्री हनूमत् पञ्च चामरम्

हनुमान जयंती प्रसाद इमरती रेसिपी Imarti Recipe

मंगळवारी हनुमान मंत्राचा जाप केल्याने सर्व कष्ट होतील दूर

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

पुढील लेख
Show comments