Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुनर्जन्माचे 8 महत्त्वपूर्ण तथ्य

Webdunia
हिंदूसह अनेक धर्म असे आहेत जे हे तथ्य स्वीकार करतात की मनुष्याच्या मृत्यूनंतर दुसरा जन्म होतो. यामागे अनेक आश्चर्यजनक तथ्य आहे. हिंदू धर्माप्रमाणे आत्मा अमर आहे ती केवळ कपड्यांप्रमाणे शरीर बदलते. भविष्यात आपल्याला कोणत्या शरीरात जन्म मिळेल हे केवळ आपल्या चांगल्या आणि वाईट कृत्यांवर अवलंबून असतं. जाणून घ्या याबद्दल आणखी काही रोमांचक तथ्य:  
* बहुतांश मनुष्य, मनुष्य रूपातच जन्म घेतो. परंतू अनेकदा मनुष्य ते प्राणी रूपातही जन्म होतो. हे केवळ आपण मागील जन्मी केलेल्या कर्मांवर अवलंबून असतं.
 
* एखाद्या व्यक्तीची इच्छा पूर्ण न झाल्यास ती व्यक्ती भूत बनते. त्या व्यक्तीची आत्मा संसारात भटकतं असते, ती तो पर्यंत नवीन शरीरा धारण करायला तयार नसते जोपर्यंत तिची अर्धवट इच्छा पूर्ण होत नाही.
 
* हिंदूप्रमाणे हे शरीर नश्वर आहे जे मरणोपरांत नष्ट होऊन जातं. म्हणूनच मृत्यू क्रिया अंतर्गत डोक्यावर मार देऊन ते तोडण्यात येतं ज्याने व्यक्तीला या जन्मातील सर्व गोष्टींचा विसर पडावा. 
 
* ग्रंथांप्रमाणे आत्मा खूप उंच आकाशात निघून जाते, जी मनुष्याच्या पोहोच बाहेर आहे आणि आत्मा नवीन शरीरातच प्रवेश करते.

* मनुष्य सात वेळा स्त्री किंवा पुरूष बनून हे शरीर धारण करतं. शरीर धारण केल्यावर त्यांना आपल्या कर्मांद्वारे आपलं भाग्य लिहिण्याची संधी मिळते.
 
* आत्मा मृत्यूनंतर लगेच नवीन जन्म घेत नाही. काही महिने किंवा वर्ष सरल्यावर अनुकूल स्थिती असल्यावर आत्मा नवीन शरीरात प्रवेश करते.
* काही ऋषी मुनींचे म्हणणे आहे की जन्मावेळी आमच्या मेंदूत पूर्वजन्माच्या सर्व गोष्टी असतात. पण याचा विसर पडतो आणि थोडं मोठं झाल्यावर आम्हाला काहीच आठवतं नाही. पूर्वजन्माच्या गोष्टी आठवणे काही विशिष्ट अथवा महान जीवात्मांसाठी शक्य आहे, सर्वांसाठी नाही.
 
* हिंदूप्रमाणे मनुष्याच्या कपाळावर तिसरा डोळा असतो. जेव्हा आत्मा, परमात्म्याला भेटते तेव्हा हा डोळा उघडतो आणि ब्रह्म बनतो. तिसरा डोळा उघडल्यावर भगवत प्राप्ती होते तोपर्यंत मनुष्य संसारात आणि विषय-वासनेत गुंतलेला असतो.

संबंधित माहिती

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments