Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सचित्र संपूर्ण राम कथा

Webdunia
सोमवार, 22 जानेवारी 2024 (09:21 IST)
भगवान श्रीराम यांच्यावर कालांतराने अनेक रामायणे लिहिली गेली आहेत, ज्यामध्ये वाल्मिकी रामायण, रामचरित मानस, कंबन रामायण, हनुमद रामायण, आनंद रामायण, मूल रामायण, एक श्लोकी रामायण आणि इतर अनेक रामायण लोकप्रिय आहेत. येथे भगवान श्रीरामाची संपूर्ण कथा संक्षिप्त रुपात देण्यात येत आहे.

1. त्रेतायुगात अयोध्याचे सूर्यवंशी राजा दशरथ यांच्या 3 राण्या कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांना चार पुत्र झाले, ज्यामध्ये श्री राम हे माता कौशल्येचे पुत्र, लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे माता सुमित्रा यांचे पुत्र आणि भरत हे माता कैकेयी यांचे पुत्र होते.
2. चारही पुत्रांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर महर्षी विश्वामित्र राजा दशरथांच्या महालात येतात आणि राम आणि लक्ष्मण यांना राक्षसांपासून त्यांच्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी वन आश्रमात घेऊन जातात. विश्वामित्रांच्या आश्रमात श्रीराम ताडकाचा वध करुन आश्रमाचे रक्षण करतात.
3. ताडका वधानंतर महर्षि विश्वामित्र श्रीराम आणि लक्ष्मण यांच्यासह जनकपुरीकडे निघतात. वाटेत ते ऋषी गौतम यांच्या आश्रमातून जातात, तिथे श्रीराम अहिल्याला आपल्या पायांनी स्पर्श करून शापातून मुक्त करतात.

4. यानंतर विश्वामित्र श्री राम आणि लक्ष्मण यांना जनकपूर येथील सीता स्वयंवरात घेऊन जातात. तेथे भगवान श्रीराम शिवजींचे पिनाक धनुष्य तोडतात.

5. यानंतर दशरथजींच्या चार मुलांचा विवाह राजा जनक आणि त्याचा धाकटा भाऊ कुशध्वज यांच्या मुलींशी होतो. श्री रामाचा विवाह सीतेशी, लक्ष्मणाचा विवाह उर्मिलाशी, मांडवीचा विवाह भरतशी आणि शत्रुघ्नचा विवाह श्रुतकीर्तीशी सोबत होतो.
6. देवासुर संग्रामात दशरथ यांना राणी कैकेयीने साथ दिली होती. यावर दशरथ त्यांना 2 वर पूर्ण करण्याचे वचन देतात. श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या तयारीच्या वेळी, मंथराच्या प्रेरणेवर, राणी कैकेयीने श्रीरामांसाठी 14 वर्षांच्या वनवासाचे वरदान मागितले आणि आपला मुलगा भरत याला अयोध्येचा राजा बनवले. 
7. आपले वडील दशरथ यांचे वचन पूर्ण करण्यासाठी भगवान श्री राम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह नियमाप्रमाणे संन्याशाचा वेष धारण करून 14 वर्षांसाठी वनात गेले.
8. प्रभु श्री राम, लक्ष्मण आणि देवी सीता यांना निषादराज केवट नावाने गंगा पार करवतात. जेव्हा श्रीराम पारितोषिक देऊ इच्छितात, तेव्हा नाविक म्हणतो की, ज्याप्रमाणे मी तुम्हाला गंगा पार करून दिली, त्याचप्रमाणे तुम्ही मला आणि माझ्या कुटुंबालाही भवसागर पार करवून द्या.
9. दंडकवनात रावणाची बहीण शूर्पणखा, सुंदर अप्सरा नयनताराच्या रूपात, झोपडीच्या बाहेर बसते आणि श्री रामांना तिच्याशी लग्न करण्यास सांगते. श्रीरामांच्या नकार दिल्यावर ती लक्ष्मणाकडे आग्रह धरते. मग ती माता सीतेला मारायला धावते. हे पाहून लक्ष्मणजी तिची नाक कापतात.
10. कापलेल्या नाकासह शूर्पणखा तिचा भाऊ आणि दंडक जंगलातील राक्षस राजा खार आणि दुषणकडे जाते. नंतर श्री रामांचे खार आणि दुषण यांच्याशी युद्ध होतं, ज्यामध्ये श्री राम त्या दोघांचा वध करतात.
11. खर-दूषणच्या मृत्यूची बातमी घेऊन शूर्पणखा भाऊ लंकापति रावणाजवळ पोहचते आणि सीतेच्या सुंदरतेचे कौतुक करते. सीतेचे अपहरण करण्यासाठी रावणाला भडकवते.
12. यानंतर रावण आपल्या मामा मारीचला ​​हरणात बदलून माता सीतेला पळवून आणण्याची योजना आखतो. सीता श्रीरामाला ते सुंदर स्वर्ण हरिण आणण्याचा आग्रह धरते. रामजी त्या हरणाला आणण्यासाठी जंगलात जातात. हरणाचे रहस्य उघड झाल्यावर राम त्याला मारतात.
13. जेव्हा श्रीराम बराच वेळ परत येत नाही तेव्हा काही अनुचित घटनेच्या भीतीने सीता लक्ष्मणाला श्रीरामांच्या मदतीसाठी वनात पाठवते. लक्ष्मणजी लक्ष्मण रेखा काढतात आणि जंगलात श्रीरामांचा शोध घेण्यासाठी जातात.
14. लक्ष्मणजी गेल्यानंतर रावण संन्यासीच्या वेशात सीतेकडून भिक्षा मागतो आणि लक्ष्मण रेषा ओलांडण्यासाठी भाग पाडतो. अशा प्रकारे रावण माता सीतेचं अपहरण करतो.
15. रावण माता सीतेचे विमानातून अपहरण करुन घेऊन जात असताना गिधाड राजा जटायू वाटेत त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात आणि या प्रयत्नात रावण जटायूचा वध करतो.
16. जटायूचा अंतिम संस्कार करून श्री राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात निघतात. शोधत शोधत ते शबरीच्या आश्रमात पोहोचतात. यानंतर ते हनुमानजी आणि सुग्रीवजींना भेटतात. सुग्रीव आपली दुर्दशा श्री रामांना सांगतात.
17. सुग्रीवची व्यथा ऐकून राम बालीचा वध करण्यास तयार होतात आणि सुग्रीव आणि बालीच्या युद्ध दरम्यान बालीचा वध करुन सुग्रीवला किष्किंधाचा राजा घोषित करतात.
18. सीतेच्या शोधात जामवंताच्या सांगण्यावरून हनुमानजींना आपल्या शक्तीची जाणीव होते आणि समुद्र पार करून अशोक वाटिकेत पोहोचतात. तेथे ते विभीषणाला भेटतात. यानंतर ते माता सीतेला श्रीरामांची अंगठी देतात आणि त्यांना श्रीरामांबद्दल सांगतात.
19. यानंतर मेघनाद हनुमानजींना बंधक ओलिस घेतो आणि त्यांना रावणाच्या समोर उभे करतो, त्यानंतर हुनमानजी रावणाला श्रीरामांसमोर शरण येण्यास किंवा युद्धासाठी तयार होण्यास सांगतात. हे ऐकून रावण त्यांच्या शेपटीला आग लावतो. हनुमानजी आपल्या जळत्या शेपटीने लंका जाळतात.
20. लंका दहन केल्यानंतर हनुमानजी विभीषण यांची श्रीरामांसोबत भेट घडवून आणतात. तेव्हा नल- नील यांच्या योजनाप्रमाणे समुद्रावर सेतु निर्माण करण्यास सुरुवात होते.
21. शेवटी श्री राम बली पुत्र अंगदला रावणाच्या भेटीला पाठवतात आणि शरणागतीचा संदेश देतात आणि शांततेचा अंतिम प्रस्ताव देतात. जेव्हा रावण सहमत होत नाही तेव्हा अंगद आपली शक्ती दाखवतात आणि इशारा देऊन परतत येतात.
22. यानंतर राम आणि रावण यांच्यात युद्ध होतं. युद्धाच्या तिसर्‍या दिवशी श्री राम कुंभकरणाशी लढतात आणि नंतर कुंभकरण मारला जातो. कुंभकर्ण आणि रावणाच्या मुलांचा वध केल्यानंतर लक्ष्मण आणि मेघनाद यांच्यात युद्ध होते, जेव्हा मेघनादने राम आणि लक्ष्मण यांना सापाच्या फासात बांधले होते. त्यानंतर गरुडजींच्या मदतीने राम आणि लक्ष्मण यांची सापाच्या जाळ्यातून सुटका होते.
23. नंतर मेघनादांच्या हल्ल्यामुळे लक्ष्मणजी बेशुद्ध होतात, त्यानंतर वैद्यराज सुषेण यांच्या सांगण्यावरून हनुमानजी संजीवनी वनस्पतीचा डोंगर आणतात. संजीवनी बूटीच्या मदतीने लक्ष्मणजी शुद्धीवर आल्यावर ते पुन्हा मेघनादशी लढतात आणि शेवटी ते मेघनादला मारतात.
24. यानंतर राम आणि रावणात घनघोर युद्ध होते. विभीषणाच्या सूचनेनुसार, श्री राम रावणाच्या नाभीत बाण सोडतात आणि नंतर रावणाचा वध केल्यानंतर, प्रभू श्रीराम पुष्पक विमानात पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येला परततात.
25. अयोध्यामध्ये प्रभु श्री राम, लक्ष्मण आणि माता सीता यांचे भव्य स्वागत केले जाते आणि नंतर त्यांचा राज्याभिषेक होतो. राज्याभिषेकात हनुमानजी, सुग्रीव, जामवंत, अंगद यांसह वानर सेनेचे अनेक जण सामील होतात.
 
।।इति राम कथा।।

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

लघुभागवत - अध्याय ८ वा

लघुभागवत - अध्याय ७ वा

लघुभागवत - अध्याय ६ वा

लघुभागवत - अध्याय ५ वा

लघु भागवत अध्याय ४ था

सर्व पहा

नक्की वाचा

ब्रेन क्लॉटिंगमुळे शरीरात दिसतात ही 5 लक्षणे, जाणून घ्या यापासून बचाव कसा करावा

आपल्या घराला वाईट शक्तिपासून वाचवण्यासाठी मागील भागाच्या भिंतीवर लावा या वस्तु

2024 हरतालिका तृतीया कधी आहे ? तिथी जाणून घ्या

Gharapuri Island: घारापुरी बेट प्राचीन बारा ज्योर्तिलिंग

Wallet in Back Pocket तुम्ही पाकिट मागच्या खिशात ठेवत असेल तर सवय सुधारा, नाहीतर पैसा कधीच स्थिर राहणार नाही

पुढील लेख
Show comments