rashifal-2026

Saptapadi सप्तपदीचे सात वचन मराठी

Webdunia
Saptapadi विवाहामधील एक महत्तवाचा विधी म्हणजे सप्तपदी. या विधीमध्ये वधू-वरांसमोर तांदळाच्या 7 राशी ठेवल्या जातात. सात मंत्रांच्या जपाने वराने वधूला चालवत त्या बाजूला सारल्या जातात. एकेका राशीवर उजवे पाऊल ठेवत प्रत्येक पाऊल ठेवल्यावर मंत्र म्हणतात ज्याचा अर्थ असा असतो-
 
पहिले पाऊल – तू एक पाऊल चाललीस, तुझे माझे सख्य झाले. सुंदर अन्न तयार करणारी अन्नपूर्णा हो. माझ्याशी एकनिष्ठ वाग. आपल्या कुटुंबाचे आपण कल्याण करु. यात वर-वधू शुद्ध आणि पौष्टिक अन्नासाठी देवाकडे प्रार्थना करतात. यात जोडपे जीवनाच्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करून त्यांचे जीवन सदैव समृद्ध करण्याचे वचन घेऊन पाऊल उचलतात.
 
दुसरे पाऊल – तू माझ्यासोबत दोन पाऊले चाललीस, माझे बळ वाढवणारी हो, आपण धैर्य आणि सामर्थ्य ठेवून कुटुंबातील आनंद संरक्षित ठेऊ. निरोगी आणि समृद्ध आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. निरोगी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सामर्थ्याने नेहमी एकमेकांना आधार देण्याचे वचन.
 
तिसरे पाऊल – तू माझ्यासोबत तीन पाऊले चाललीस, धनप्राप्त करुन देणारी हो. आपण दोघे संपत्ती व ज्ञानाची समृद्धी करु. यात जोडपे संपत्तीसाठी देवाकडे प्रार्थना करतात. एकमेकांशी विश्वासू राहणे आणि स्वत: साठी आणि कुटुंबासाठी श्रीमंत आणि समृद्ध जीवन जगण्याचे वचन.
 
चवथे पाऊल – तू माझ्यासोबत चार पाऊले चाललीस, तू सुख वाढवणारी हो. आपण दोघेही सुख, आनंद वाढवू. सुखासाठी तसेच एकमेकांबद्दल आणि त्यांच्या संबंधित कुटुंबांबद्दल प्रेम आणि आदर वाढवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात.
 
पाचवे पाऊल – तू माझ्याबरोबर पाच पाऊले चाललीस, तू संतती वाढवणारी हो. आपण दोघे सद्गुणी संतती निर्माण करु. संततीसाठी देवाकडे प्रार्थना करतात.
 
सहावे पाऊल – तू माझ्याबरोबर सहा पाऊले चाललीस, तू सर्व ऋतुमध्ये सुख देणारी हो. शांतीपूर्ण दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात.
 
सातवे पाऊल – तू माझ्यासोबत सात पाऊले चाललीस तुझे माझ्याशी सख्य दृढ होवो. आपल्या कुटुंबाचे सुख-दु:ख आपण आपल्या हृद्यात जतन करु. वर-वधू सहवास, एकत्रता, निष्ठा आणि समंजसपणासाठी देवाला प्रार्थना करतात. एकमेकांचे मित्र बनवण्याची आणि आयुष्यभर मैत्री निभावण्याची परिपक्वता देण्याची प्रार्थना करतात. यात नवरा वधूला म्हणतो की आता सात सात फेरे पावले माझ्यासोबत चालली आहेस यास्तव माझी दृढ सखी हो. शेवटच्या फेर्‍यात जोडपे विश्वाच्या शांतीसाठी देखील समंजस जीवन, निष्ठा, एकता आणि सहवासासाठी प्रार्थना करतात.
 
ही सात वचने एक पाया प्रदान करतात असे मानले जाते ज्याभोवती मजबूत आणि शाश्वत नातेसंबंध बांधले जातात. जरी आपण वैदिक काळापासून खूप दूर आलो आहोत, परंतु जेव्हा वधू आणि वर दोघेही एकमेकांना समान म्हणून वचन देतात तेव्हा हे सर्व खरे ठरतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

संत तुकाराम महाराज मंदिर श्री तीर्थक्षेत्र देहू

Tukaram Beej 2026 Messages in Marathi तुकाराम बीज निमित्त संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांना त्रिवार वंदन

आरती गुरुवारची

Sant Tukaram Beej 2026 संत तुकाराम बीज संपूर्ण माहिती आणि महत्व

गुरुवारी उधार देऊ नये व घेऊ नये

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

पुढील लेख