Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाशिवरात्रीचे वैज्ञानिक महत्त्व, रात्री जागरणाला विशेष महत्त्व

Webdunia
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (08:58 IST)
दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री येते. असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचे उपवास आणि पूजा केल्याने ते खूप प्रसन्न होतात आणि भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. हिंदू धर्मग्रंथांमध्ये महाशिवरात्रीची संपूर्ण रात्र जागरण करून महादेवाची पूजा करण्याचे सांगितले आहे. महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या.
 
धार्मिक महत्त्व
जर आपण धार्मिक महत्त्वाबद्दल बोललो तर महाशिवरात्रीची रात्र ही शिव आणि माता पार्वतीच्या लग्नाची रात्र मानली जाते. या दिवशी शिवाने वैराग्य जीवनातून गृहस्थ जीवनाकडे पाऊल ठेवले होते. ही रात्र शिव आणि पार्वती मातेसाठी खूप खास होती. असे मानले जाते की जे भक्त या रात्री जागरण करून शिव आणि त्यांची शक्ती माता पार्वतीची पूजा - आराधना करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात. म्हणूनच महाशिवरात्रीची रात्र कधीही झोपून गमावू नये.
 
वैज्ञानिक महत्त्व
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तरी महाशिवरात्रीची रात्र खूप खास असते. खरं तर या रात्री ग्रहाचा उत्तर गोलार्ध अशा प्रकारे स्थित आहे की मनुष्याच्या आतली ऊर्जा नैसर्गिकरित्या वरच्या दिशेने जाऊ लागते. म्हणजेच निसर्गच मनुष्याला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर पोहोचण्यास मदत करत असतो. धार्मिकतेने बोलायचे तर निसर्ग त्या रात्री माणसाला देवाशी जोडतो. लोकांना याचा पुरेपूर लाभ मिळावा, यासाठी महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करुन पाठीचा कणा सरळ करून ध्यानस्थ बसावे, असे सांगण्यात आले आहे.
 
महाशिवरात्री ही मासिक शिवरात्रीपेक्षा वेगळी आहे
पाहिले तर दर महिन्यातील अमावास्येच्या एक दिवस आधी म्हणजेच कृष्ण पक्षातील चतुर्दशीला शिवरात्री म्हणतात. परंतु माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात. अनेक ज्योतिषी मानतात की प्रत्येक महिन्याच्या अमावस्येच्या रात्री चंद्र पूर्णपणे कमजोर होतो. अशा स्थितीत अमावस्येच्या अशुभ प्रभावापासून महिन्याचे रक्षण करण्यासाठी चतुर्दशी तिथीच्या एक रात्री आधी शिवरात्री साजरी करून शिवाची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे हिंदू नववर्ष सुरू होण्यापूर्वी महाशिवरात्री पूजन केलं जातं जेणेकरून क्षयग्रस्त वर्षाच्या दुष्परिणामांपासून नवीन वर्ष वाचता येऊ शकतं.

संबंधित माहिती

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments