Marathi Biodata Maker

Shri Swami Samarth : श्री स्वामी समर्थांचा जन्म कधी झाला ?

Webdunia
बुधवार, 10 एप्रिल 2024 (08:50 IST)
इसवी सन 1856 ते 1878 19व्या शतकात. महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे दत्त संप्रदायातील थोर संत होऊन गेले.  स्वामींना महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात गाणगापूरचे स्वामी 'नृसिंह सरस्वती' म्हणून ओळखले जाते, तर काही ठिकाणी त्यांना 'चंचल भारती' आणि 'दिगंबर स्वामी' म्हणूनही ओळखले जाते. श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतर श्री दत्तात्रय हे तीसरे पूर्णावतार आहे. अशी आख्यायिका आहे. गाणगापुरातील श्री नृसिंह सरस्वती हेच श्री शैलमजवळील कर्दळीवनातून स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले. स्वामी समर्थांच्या मुखातून निघाले उद्गार नृसिंह सरस्वती अवतार असल्याचे समजते. तेथून ते आसे तुहिमाचलास गेले.
 
इ.स. 1856 च्या सुमारास स्वामी समर्थ मंगळवेढ्यातुन अक्कलकोट आले त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके 1778, अनल नाम संवत्सरे, दि. 06/04/1856 होता  
 
श्री नृसिंह सरस्वती ह्यांनी गाणगापुरात पादुकांची स्थापना केल्यानंतर आंध्रप्रदेशातील श्री शैल्यम क्षेत्राजवळ कर्दळीवनात अदृश्य झाले. 300 वर्ष कठोर तपश्चर्या करत असताना मुंग्यांनी त्यांचा वर वारूळ केले. एके दिवशी एक लाकूडतोड्या त्या वनात लाकूड तोडीत असतांना त्याचा हातून कुऱ्हाड निसटून त्या वारुळांवर पडली. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली. त्याच क्षणात दिव्य तेज पुंजातून त्या लाकूडतोड्यासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकटली ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ असे. 
 
आपल्याहातून एक महापुरुष जखमी झाल्याचे समजल्यावर त्याला दुःख व भय वाटू लागले. त्यांनी त्या लाकूडतोड्यास अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. इ.स. 1856 साली स्वामीने अक्कलकोट मध्ये अवतरले त्यामुळे अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले.
 
स्वामींनी श्रीक्षेत्र त्रयम्बकेश्वर येथे शेगावच्या श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराजांना दीक्षा दिली. तत्पश्चात स्वामी पंढरपूर, मोहोळ भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर सोलापुरात आले. मंगळवेढे गावात राहून त्यांनी आपल्या लीलेने भक्तांना दुःख मुक्त केले.चोळप्पा यांनी स्वामींची अनन्यभावे भक्ती आणि सेवा  केली.  
"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" असे म्हणून स्वामी सतत आपल्या पाठीशी असून आपल्याला मार्ग दाखवीत आहे.
 
 Edited By - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

अधिकमासात जावयाला वाण का देतात? जाणून घ्या जाळीदार अनारशांची परफेक्ट रेसिपी आणि ३३ संख्येचे महत्त्व!

गंगा दशहरा आणि जावयाला वाण देण्याची शास्त्रोक्त विधी

अधिकमास माहात्म्य संपूर्ण अध्याय

सोमवारी या 8 गोष्टी करू नका, नाहीतर तुम्हाला पश्चाताप होईल

Shiva Mantra: सोमवारी पूजा करताना महादेव मंत्राचा जप करावा

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments