Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Avoid on Wednesday बुधवारी ही कामे करु नये

Webdunia
Avoid on Wednesday हिंदू धर्मात बुधवारचा दिवस शुभ मानला जातो. बुधवार हा गणपतीचा दिवस म्हणून साजरा केला जातो, ज्याची नेहमी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी पूजा केली जाते. असे मानले जाते की कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात बुधवारी करावी.
 
बुधवारी ही कामे करु नये
* शास्त्रात अशी काही कामे सांगितली आहेत जी बुधवारी केल्याने तुमची बुद्धी नष्ट होते.
* बुधवारी विडा खाऊ नये.
* बुधवारी दूध आटवून रबडी, खवा किंवा खीर बनवू नये.
* बुधवारी नवीन बूट आणि कपडे खरेदी करू नका किंवा नवीन कपडे घालू नका.
* या दिवशी चुकूनही घरच्या किंवा बाहेरच्या मुलीला शिव्या घालू नयेत. त्यापेक्षा त्यांना आदरपूर्वक घरी बोलावून भेटवस्तू दिल्या पाहिजेत.
* बुधवारी चुकूनही षंढांची चेष्टा करू नये. त्यापेक्षा त्यांना शक्य तितकी मदत केली पाहिजे.
* बुधवारी मुलींनी आपल्या माहेरच्या घरातून बाहेर पडू नये आणि पुरुषांनी सासरच्या घरी जाऊ नये, असे म्हटले जाते. या दिवशी बहीण, मावशी आणि मुलीला घरी बोलावू नये.
* या दिवशी टूथ पेस्ट, ब्रश किंवा केसांशी संबंधित कोणतीही वस्तू खरेदी करू नये.
* जर तुम्ही मुलीची आई असाल तर तुम्ही बुधवारी आपले डोके धुवू नये. असे केल्याने मुलीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
* तांदूळ, एक्वेरियम, भांडी यासारख्या वस्तू बुधवारी खरेदी करू नयेत.
 
हे काम बुधवारी अवश्य करावे
* तुमची इच्छा असल्यास बुधवारी उपवास करून गणेशाची पूजा सुरू करू शकता. 
* बुधवारच्या उपवासात मीठ खाऊ नये.
* बुधवारी गायीला हिरवा पालेभाज्या खायला द्या आणि गायीच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा.
* बुधवारी गणेशाला गूळ आणि तूप अर्पण करा आणि गायीला खाऊ घाला.
* असे मानले जाते की बुधवारी बुध ग्रह केल्याने कुंडलीतील बुधाचे सर्व अशुभ प्रभाव दूर होतात.
पैसे वाचवता येत नसेल तर बुधवारी उपवास करून कथा वाचा.
* बुधवारचा उपवास केल्याने जीवनात पैशाच्या कमतरतेपासून मुक्ती मिळते आणि सुखाची प्राप्ती होते. बुध हा वस्तूंचा आणि व्यापाऱ्यांचा स्वामी मानला जातो. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात अडचणी येत असतील तर हे व्रत पाळल्यास समस्या दूर होऊ शकतात.
* 'ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात।। ' बुधवारी या मंत्राचा जप केल्याने भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या मंत्राचा जप 108 वेळा केला पाहिजे.

संबंधित माहिती

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments