Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वरुथिनी एकादशी व्रत कथा (Varuthini Ekadashi Katha)

Webdunia
शुक्रवार, 7 मे 2021 (09:19 IST)
भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या विनंतीवर या एकादशी व्रताची कथा आणि महत्त्व सांगितले. त्यांनी सांगितले की प्राचीन काळी रेवा अर्थात नर्मदा नदीच्या काठावर मान्धाता  नावाचा अत्यंत परोपकारी व तपस्वी राजा राज्य करीत होता. दानवीर राजा जेव्हा जंगलात तपस्या करत होता तेव्हा जंगली अस्वल आला आणि राजाचा पाय चावू लागला. 
 
तो राजाला खेचून दाट जंगलात घेऊन गेला. तेव्हा राजाने तपस्या धर्माचे पालन करत विचलित न होता प्रभू विष्णूंना प्रार्थना केली.
 
तपस्वी राजाची प्रार्थना ऐकून प्रभू विष्णू तेथे प्रकट झाले आणि सुदर्शन चक्राने अस्वलाचे वध केले, परंतू तोपर्यंत अस्वलाने राजाचा एक पाय खाल्ला होता. याने राजा मान्धाता खूप दु:खी झाले. श्री हरींनी त्यांच्या वेदना समजून पवित्र नगरी मथुरा जाऊन प्रभूंच्या वराह अवताराची पूजा करण्या सांगितले तसंच वरूथिनी एकादशी व्रत करण्यास सांगितले. या व्रताच्या प्रभावाने पाय बरा होईल असे म्हटले. कारण या पायाची दशा पूर्वजन्मी घडलेल्या गुन्ह्यामुळे झाल्याचे त्यांनी म्हटले.
 
प्रभू श्रीहरी विष्णुंच्या आज्ञांचे पालन करत राजा पवित्र पावन नगरी मथुरा पोहचले आणि पूर्ण श्रद्धा व भक्तिभावाने व्रत केले ज्यामुळे त्यांनी गमावलेला पाय पुन: प्राप्त झाला.

संबंधित माहिती

आंजनेय द्वादश नाम स्तोत्रम्

Hanuman Jayanti 2024: हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा

Solah Somwar fastसोळा सोमवार व्रत सुरू करण्यापूर्वी जाणून घ्या या संबंधित महत्त्वाच्या गोष्टी

Mahadev Mantra महादेवाचे मंत्र सोमवारी नक्की जपावे

Mahadev Aarti शंकराची आरती : लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावरून अमरावतीमध्ये राडा

अनोखे प्रकरण; मतदानासाठी आलेल्या व्यक्तीला सांगण्यात आले - तू मेला आहेस मतदान करू शकणार नाही

मुंबई विमानतळावर नूडल्सच्या पाकिटात करोडो रुपयांचे हिरे जप्त केले, आरोपीला अटक

RR vs MI: मुंबई विरुद्धच्या सामन्यात युझवेंद्र चहलने केला विक्रम, 200 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला

RR vs MI: यशस्वी जैस्वालने नाबाद शतक झळकावत मुंबईचा नऊ गडी राखून पराभव केला

पुढील लेख
Show comments