Marathi Biodata Maker

चैत्र म्हणजे वसंतशोभा

Webdunia
सोमवार, 8 एप्रिल 2019 (12:46 IST)
चैत्र हा वसंताच्या आगमनाचा महिना आहे. आसमंत हळूहळू गरम उष्णतेने भरू लागतानाच चैत्रपालवी झाडावर झळाळू लागते. गीतरामायणात रामाच्या जन्माच्या वर्णनाच्या वेळी (कारण रामनवमी चैत्रातच असते ना!) ग.दि.मा. म्हणतात, ''गंधयुक्त तरिही उष्ण वात ते किती...'' गरम असली तरी हवा गंधयुक्त म्हणजेच सुगंधित असते कारण सर्वात सुवासिक असा मोगरा याच काळात फुलतो, बहरतो.
 
गरमीच्या झळा जाणवत असताना आगीच्या ज्वालांप्रमाणे भासणारा पांगारा, पूर्ण फुलांनी डवरलेला निष्पर्ण (रस्त्यावर लाल रंगाचा गालिचा पसरवणारा) गुलमोहर पळस यासारखे मोठे वृक्षही आपले थोराडपण विसरून नव्या नव्हाळीने सजतात.
 
फळांचा राजा तर याच काळात मोहरतो, फळतो अन् आपल्या रसाळ गोमट्या फळांनी लहान थोरांची, गरीब-श्रीमंताची रसना तृप्त करायला तयार होत असतो. सगळीकडे उत्तमोत्तम गोष्टींची पखरण करणारा हा वसंत म्हणजे एखाद्या राजाच आहे (ऋतूंचा राजाच म्हणाना !) राजाच तो, त्याला कशाची कमतरता, सगळ अगदी व्यवस्थित, साग्रसंगीत व आपल्या उच्च अभिरुचीनुसार तो घडवतो जसे मोगर्‍याचा सुगंध, आंब्याची डाळ, पन्हे, वाळ्याचे पडदे हा सारा थाट, ही व्यवस्था त्याच्या आगमनाचीच. असतात. मंगळागौर, डोहाळजेवण, हळदीकुंकू यासारखे (बायकी!) सण म्हणजे त्यांच्यातील सृजनाला आवतण. गौर सजवणे, वेगवेगळ्या रांगोळ्या, कला कुसरीच्या वस्तू, पाकक्रियेतली निपुणता हयात त्या हळूहळू पारंगत होत असाव्यात.
 
हल्ली या प्रकारचे समारंभ आपल्याला वेळानुसार, सवडीनुसार का होईना पण होतातच आणि त्यातून सर्वजण आनंदही मिळवतात कारण आजच्या धकाधकीच्या आयुष्यातही प्रत्येकीला मोकळे होण्यासाठी अशी संधी मिळणे गरजेचेच आहे.
 
याच महिन्यात 'बालचंद्रमा व्रत' करतात म्हणजे सूर्यास्ताला अंघोळ करून आकाशातल्या चंद्राची किंवा तांदळा पासून चंद्र तयार करून त्याची पूजा करायची. (बालचंद्रमसे नम:) प्रत्येक महिन्याच्या चंद्रदर्शना दिवशी ह्या प्रमाणे करावे वर्षभर हे व्रत करतात व ह्या दिवशी तळलेले पदार्थ खात नाहीत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Datta Jayanti 2025 श्री दत्तात्रेयांना प्रिय असलेले आणि नैवेद्य म्हणून खास तयार केले जाणारे पदार्थ

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

श्रीदत्तगुरू भक्तांची पंढरी श्रीक्षेत्र गाणगापूर

भगवान दत्तात्रेयांचे हे ४ मंत्र जीवनातील सर्व संकटे दूर करतील...

मार्गशीर्ष गुरुवार आरती श्री महालक्ष्मी देवीची

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments