Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

होलाष्टक कथा, काय करावे या दरम्यान जाणून घ्या

Webdunia
शुक्रवार, 11 मार्च 2022 (15:17 IST)
होलाष्टक म्हणजे-
होळीच्या आठ दिवसांपूर्वी होलिका पूजन करत असणार्‍या ठिकाणी गंगाजल टाकून ती जागा शुद्ध करतात. नंतर तेथे वाळलेले लाकूड, कंडे, आणि होलिका दहन करण्यासाठी दोन काठ्या स्थापित केल्या जातात. एक काठी प्रह्लाद आणि दुसरी काठी त्याची आत्या होलिकेसाठी मानली जाते. याच दिवशी होलाष्टक प्रारंभ असल्याचे मानले जाते. हिंदू मान्यतेनुसार या दिवसांमध्ये कुठलेही शुभ कार्य करू नये. विवाह, गृहप्रवेश, मूडनं, नामकरण व विद्यारंभ इत्यादी सर्व मांगलिक कार्य किंवा कुठलेही नवीन कार्य या दरम्यान प्रारंभ करणे शास्त्रानुसार वर्जित मानले गेले आहे.
 
काय करावे -
ज्योतिष मान्यतेनुसार अष्टमी ते पौर्णिमा पर्यंत नवग्रह देखील उग्र रूप घेतलेले असतात. याच कारणामुळे या दरम्यान केलेल्या शुभ कार्योंमध्ये अमंगल होण्याची आशंका असते. या दिवसांमध्ये व्यक्तीच्या निर्णय घेण्याची क्षमता कमजोर होते. होलाष्टकला व्रत, पूजन आणि हवन या दृष्टीने चांगलं मानले गेले आहे. या दिवसात केलेल्या दानामुळे जीवनातील कष्टांपासून मुक्ती मिळते.
 
कथा- 
शिव पुराणानुसार देवतांच्या विनंतीवर कामदेव यांनी महादेवाची तपस्या भंग केली होती. याने महादेव अत्यंत क्रोधित झाले होते, त्यांनी आपल्या तिसर्‍या नेत्राच्या ज्योतने कामदेवांना भस्म केले होते. प्रेम देवता कामदेव हे भस्म झाल्यावर संपूर्ण सृष्टी शोक व्याप्त झाला. आपल्या पतीला पुनः जिवंत करण्यासाठी रतीने इतर देवी-देवतांसह महादेवाला प्रार्थना केली. प्रसन्न होऊन शंकराने कामदेवांना पुर्नजीवनाचा आशीर्वाद दिला. फाल्गुन शुक्ल अष्टमीला कामदेव भस्म झाले आणि आठ दिवसानंतर महादेवाकडून रतीला त्यांच्या पुर्नजीवनाचा आशीर्वाद प्राप्त झाला. ही देखील मान्यता आहे की भक्त प्रह्लादच्या अनन्य नारायण भक्तीने क्रुद्ध होऊन हिरण्यकश्यपने होळीच्या आठ दिवसांपूर्वीपासून प्रह्लादाला अनेक प्रकाराचे जघन्य कष्ट दिले होते. तेव्हापासून भक्तीवर प्रहार केल्यामुळे हे आठ दिवस हिंदू धर्मात अशुभ मानले गेले आहे.

संबंधित माहिती

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments