Festival Posters

होलिका दहन कथा Holika Dahan Katha

Webdunia
हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता. त्याने तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवलेले होते. हिरण्यकश्यपने जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला. त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले. हिरण्यकश्यप स्वत:ला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता.
 
पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेल्या त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णुभक्त निघाला. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा (नारायणाचा) परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येकावेळी तो अयशस्वी ठरला. 
 
सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्यकश्यपला त्याची बहीण जिचे नाव होलिका होते ती म्हणाली " दादा, मला तुझा त्रास बघवत नाही.मला अग्नी देवाकडून असा वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही.मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते. मला वरदान असल्यामुळे मी जाळणार नाही पण तो जाळून खाक होईल."
 
हे ऐकून हिरण्यकश्यपने गावात नि वाळलेल्या कात्क्याने मोठी पेढी तयार केली. त्यात होलिका प्रल्हादला घेऊन बसली. व शिपायांनी आग लावली. होलिका आपल्याच वरदानाच्या धुंधीत होती. परंतु, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिकेचे अंग जाळू लागले. तिच्या अंगाचा दाह होऊ लागला. प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता. शेवटी जे व्हायचे तेच झाले. होलिका जाळून खाक झाली नि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला.
 
तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली. असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरविणे हा होलिका दहनामागील उद्देश आहे. म्हणून होळीला महत्त्व आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

महावीर जयंतीच्या दिवशी या ५ गोष्टी करा, तुम्हाला सुख आणि शांतीचा आशीर्वाद मिळेल

Hanuman Temples Maharashtra महाराष्ट्रातील प्रमुख, प्रसिद्ध आणि जागृत हनुमान मंदिरे

महावीर स्वामी आरती : Lord Mahavir aarti

आरती मंगळवारची

Turmeric ceremony लग्नात मामाकडून भाचीला हळदीसाठी पिवळी साडीच का दिली जाते?

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

पुढील लेख
Show comments