Festival Posters

होलिका दहन कथा Holika Dahan Katha

Webdunia
हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता. त्याने तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवलेले होते. हिरण्यकश्यपने जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला. त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले. हिरण्यकश्यप स्वत:ला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता.
 
पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेल्या त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णुभक्त निघाला. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा (नारायणाचा) परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येकावेळी तो अयशस्वी ठरला. 
 
सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्यकश्यपला त्याची बहीण जिचे नाव होलिका होते ती म्हणाली " दादा, मला तुझा त्रास बघवत नाही.मला अग्नी देवाकडून असा वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही.मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते. मला वरदान असल्यामुळे मी जाळणार नाही पण तो जाळून खाक होईल."
 
हे ऐकून हिरण्यकश्यपने गावात नि वाळलेल्या कात्क्याने मोठी पेढी तयार केली. त्यात होलिका प्रल्हादला घेऊन बसली. व शिपायांनी आग लावली. होलिका आपल्याच वरदानाच्या धुंधीत होती. परंतु, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिकेचे अंग जाळू लागले. तिच्या अंगाचा दाह होऊ लागला. प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता. शेवटी जे व्हायचे तेच झाले. होलिका जाळून खाक झाली नि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला.
 
तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली. असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरविणे हा होलिका दहनामागील उद्देश आहे. म्हणून होळीला महत्त्व आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

रविवार: या गोष्टी लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा आनंदी राहाल

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

रविवारी करा आरती सूर्याची

रविवारी या प्रकारे सूर्यदेवाची पूजा करा, सर्व दुःख दूर होतील

Christmas Destinations 2025 ख्रिसमस दरम्यान ही ठिकाणे खास बनतात; नक्कीच भेट द्या

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments