Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अखेर पाकिस्तान नरमले

Webdunia
बुधवार, 31 डिसेंबर 2008 (19:48 IST)
वाढता आंतरराष्ट्रीय दबाव आणि भारताने केलेली लष्करी कारवाईची तयारी यामुळे भयभीत झालेल्या पाकिस्तानचा भारतविरोधी सूर काहीसा मवाळ झाला आहे. भारताबरोबर आम्हाला कोणत्याही प्रकारचा लष्करी संघर्ष नकोय, असे म्हणत पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी शांततेची भाषा सुरू केलीय.

आमची युद्धाची तयारी आहे, असे सांगणारे गिलानी अचानक मवाळ झाले असून, आमच्या शेजार्‍यांबरोबर आम्हाला कोणत्याही प्रकारचा संघर्ष नको आहे. आम्हाला त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत, असे त्यांनी आज सांगितले.

बेनझीर भुट्टो यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अर्थात, पाकिस्तानला डिवचल्यास परिणाम भोगण्यास तयार रहा, असे सांगून 'आम्ही स्वतःहून कारवाई करणार नाही. मात्र, तिकडून कारवाई झाल्यास त्याला उत्तर देऊ, असे सांगत भाषा मवाळ झाली तरी पवित्रा आक्रमक आहे, हे दाखवून देण्याचा फुकाचा प्रयत्नही केला.

आम्ही स्वतःहून आक्रमण करणार नाही. पण कुणी केल्यास आमच्या प्रिय देशाचे रक्षण करण्यास आम्ही सक्षम आहोत, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

अमित शहा यांची सीता मढी आणि मधुबनी मध्ये आज रॅली, केंद्रीय गृहमंत्री यांचा पाचवा बिहार दौरा

कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज

मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले

Show comments