Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दहशतवादाचा बिमोड करायला हवा-नरेंद्र मोदी

Webdunia
गुरूवार, 27 नोव्हेंबर 2014 (11:38 IST)
मुंबईवरील 26/11च्या सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ल्याला सहा वर्ष पूर्ण झालीत. या हल्ल्याचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क परिषदेत उपस्थित केला. दहशतवादाने अनेकांचे आयुष्य उध्वस्त केले आहे. त्यामुळे सर्वांनी दहशतवादाचा कायमचा बंदोबस्त करायला हवा. त्यासाठी सार्क देशांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन मोदी यांनी नेपाळमधील सार्क परिषदेत केले.
 
मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीला अन्य सार्क देशांच्या प्रतिनिधींचा उल्लेख केला. मात्र, त्याचवेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा उल्लेख मोदी यांनी टाळला. पाकिस्तानसाठी हा कठोर इशारा असल्याचे बोलले जात आहे. 
 
दरम्यान, सार्क देशांच्या समस्या आणि विकासासाठी प्रयत्न करण्यावर भर मोदींनी दिला. सार्क देशांमध्ये आपापसातील सहकार्य, व्यापार आणि दळणवळण वाढण्याची गरज मोदींनी यावेळी व्यक्त केली.
 
पुढे वाचा मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे...
> दहशतवादाचा उखडून टाकण्यासाठी सार्क देशांनी एकत्र यावे.
> दक्षिण आशियाई विद्यापीठाची निर्मितीसाठी प्रयत्न
> सार्क देशांनी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यावर भर
> भारतीय गुंतवणुकदारांच्या माध्यमातून तरूणांसाठी रोजगाराची निर्मिती
> सार्क देशांनी उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील अंतर मिटवण्यावर भर
> भारतातील पायाभूत सुविधांचा विकासावर भर
> पायाभूत सुविधा ही सार्क देशांपुढील महत्वपूर्ण समस्या आहे.
> आपल्याला भूतकाळ विसरुन पुढे जायला हवे
> सार्क देश समान समस्यांचा सामना करतायेत

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

Show comments