Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तालिबान्यांकडून काबूल विमानतळावर गोळीबारामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू

Webdunia
रविवार, 22 ऑगस्ट 2021 (14:37 IST)
काबूल आणि अफगाणिस्तानमध्ये सध्याची परिस्थिती पाहिली असता, अत्यंत भीषण आहे. तालिबान्यांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी अनेक अफगाण नागरिक काबूल विमानतळावर उपस्थिती दर्शवत आहेत. परंतु आज (रविवार) तालिबान्यांकडून काबूल विमानतळावर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. त्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी अफगाण नागरिकांची धावाधाव सुरू होती. मात्र, गोळीबारामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मृत्यूच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता ब्रिटीश डिफेन्स मिनीस्टरकडून वर्तवण्यात येत आहे.
  
काबुलहून १६८ नागरिक भारतात दाखल ..
दिल्लीनजीकच्या गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर हे विमान उतरवण्यात आलं. या विमानातून 107 भारतीय नागरिकांसह एकूण 168 जण भारतात दाखल झाले. तत्पूर्वी, आजच ताजिकिस्तानहून 87 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं एक विमान नवी दिल्ली विमानतळावर पोहोचलं. यामध्ये दोन नेपाळी नागरिकांचाही समावेश होता. विमानतळाबाहेर पडण्याआधी या सर्व प्रवाशांना कोव्हिड चाचणी करून घ्यावी लागणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

Ratha Saptami 2025 रथी सप्तमी कधी? या दिवशी काय करावे

Golden Baba ६ कोटींचे सोने घालून फिरतात ६७ वर्षीय हे बाबा, प्रत्येक दागिन्याशी साधनेची एक कहाणी जोडलेली

Basant Panchami 2025 वसंत पंचमीला पिवळे वस्त्र का परिधान केले जातात?

सर्व पहा

नवीन

LIVE: ठाण्यात धोकादायक रसायनांच्या अवैध साठ्यावर गुन्हे शाखेचा छापा

अधिवेशन सोडल्यानंतर संतप्त छगन भुजबळ बाहेर आले, म्हणाले- मान मिळाला नाही

ठाण्यात धोकादायक रसायनांच्या अवैध साठ्यावर गुन्हे शाखेचा छापा,गोदाम मालकावर गुन्हा दाखल

भारतीय ऑटोमोबाईल उद्योग जगात नंबर 1असेल, नितीन गडकरी यांचे भाकीत

युद्धबंदीच्या घोषणेपासून इस्रायली हल्ल्यात 72 ठार

पुढील लेख
Show comments