Publish Date: Sat, 07 Oct 2017 (12:58 IST)
Updated Date: Sat, 07 Oct 2017 (13:00 IST)
पुन्हा चीनने चळवळ सुरु केली आहे डोकलामप्रकरणात अरेरावी केली असून डोकलाम आमचाच भाग आहे असे म्हणत या भागात सैन्य वाढवले आहे. चीन म्हणतय की आमच्या भागात आमचे सैन्य आहे त्यामुळे त्याची उपस्थिती हा वादाचा मुद्दा असू शकत नाही. आम्ही सर्व आमच्या भूमीचंरक्षण करत आहोत, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा आता वादाला सुरुवात झाली आहे. यामध्ये वादग्रस्त असलेल्या डोकलाम भागात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केल्याचं सांगण्यात येत आहे. या आधी भारत आणि चीनीमध्ये 73 दिवस या कारणावरून मोठा वाद सुरु होता.