Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांचं देशवासीयांना भावूक पत्र

Webdunia
सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (14:33 IST)
माझ्यासमोर आव्हानात्मक पर्याय होते. मला कठोर निर्णय घ्यावा लागला आणि म्हणून मी देश सोडला आहे. असे सांगत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशवासीयांना भावूक पत्र लिहिले आहे.
 
तालिबानने अफगाणिस्तानातील बहुतांश शहरांवर कब्जा केल्यनांतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळून गेले आहेत. असे वृत्त सर्वत्र पसरले. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष घनी यांनी देशवासीयांना भावूक पत्र लिहित देश का सोडला? याचे कारण दिले आहे.
 
अशरफ गनी यांनी पोस्ट काय लिहिले... 
राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'जर अफगाणिस्तानात राहिलो असतो तर मोठ्या संख्येने लोकं देशासाठी लढायला आले असते. अशा परिस्थितीत असंख्य लोकांचा मृत्यू झाला असता. तसेच काबुल शहर पूर्णपणे उद्धवस्त झाले असते. म्हणून मला देश सोडण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. आता तालिबान जिंकला आहे. त्यामुळे आता अफगाण लोकांचा सन्मान, संपत्ती आणि सुरक्षेसाठी तो जबाबदार आहे. एका ऐतिहासिक परीक्षेचा तालिबान सामना करत आहे. आता एकतर तो अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवेल किंवा इतर ठिकाणांना आणि नेटवर्कला प्राधान्य देईल.'
 
पण अशरफ गनी यांनी आपल्या पोस्टमधून सध्या ते कुठे आहेत, याबाबत माहिती दिली नाही आहे. टोलो न्यूजच्या माहितीनुसार, अफरश गनी ताजिकिस्तानमध्ये आहे. दरम्यान शांती प्रक्रियाचे प्रमुख अब्दुल्ला-अब्दुल्ला यांनी अफगाणिस्तानवर ही परिस्थिती आणण्यासाठी गनी यांना दोषी ठरवले आहे. सध्या अफगाणिस्तानची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. याशिवाय काबुल विमानतळावरून उड्डाणे बंद करण्यात आली आहेत.

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments