Dharma Sangrah

एव्हरेस्ट पर्वताची उंची मोजणार नेपाळ

Webdunia
शनिवार, 23 सप्टेंबर 2017 (09:23 IST)
नेपाळ सरकार जगातील सर्वात उंच पर्वत शिखर एव्हरेस्टची उंची तपासणार आहे. जगातील या सर्वात उंच पर्वतशिखराची उंची यापूर्वी 1954 साली मोजण्यात आली होती. मात्र दोन वर्षांपूर्वी, 2015 मध्ये झालेल्या 7.8 रिश्‍तरच्या भूकंपामुळे एव्हरेस्टची उंची कमी झाली आहे असे काही तज्ञांचे मत आहे. हा विवाद कायमचा संपवण्यासाठी नेपाळ सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती शुक्रवारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
जगातील सर्वात उंच पर्वत शिखर एव्हरेस्ट आणि अन्य 14 सर्वात उंच पर्वत शिखरांपैकी निम्मी पर्वत शिखरे नेपाळमध्ये आहेत. मात्र नेपाळने स्वत: त्यांची उंची कधीही मोजली नाही. सर्वे ऑफ इंडियाने 1954 साली मोजल्यानुसार एव्हरेस्टची उंची 8848 मीटर्स म्हणजे 29028 फूट असल्याचे मानले गेलेले आहे. पाश्‍च्यात्य पर्वतारोही त्याची उंची 8850 मीटर्स म्हणजे 29035 फूट मानतात. 1999 साली एनजीएस (नॅशनल जॉग्रफिक सोसायटी) आणि बीएमएस (बोस्टन्स म्युझीयम ऑफ सायन्स) यांनी उपग्रह आधारित तंत्रज्ञानाने ही उंची मोजली होती. 2005 साली चिनी गिर्यारोहक आणि संशोधकांनी ही उंची 8844. 83 मीटर्स म्हणजे 29,035 फूट असल्याचे जाहीर केले आहे.
 
हा विवाद मिटवण्यासार्ठीॅ एव्हरेस्टची उंची मोजण्याचे नेपाळ सरकारने ठरवले आहे. यासाठी लागणारी साधन सामग्री नेपाळ सरकारकडे नाही. परंतु ती भाड्याने मिळू शकते असे म्हटले आहे. या कामासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. हवामान अनुकूल असल्यास पुढील वर्षी गिर्यारोहण मोसमात कामाला सुरुवात करण्यात येईल असे नेपाळ सर्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पतीला गुंगीचे औषध देऊन कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या... पत्नीने बहिणीच्या आणि प्रियकराच्या मदतीने कट रचला

LIVE: खडकवासला-फुरसुंगी बोगदा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा

महाराष्ट्राचे आसाराम बापू! स्वघोषित ईश्वर कॅप्टन अशोक खरात कोण आहेत?, ५८ व्हिडिओमध्ये नक्की काय

शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्रात 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा जोर धरली आहे, उद्धव गटात चिंता वाढली?

महाराष्ट्रात प्लास्टिकच्या फुलांच्या वाढत्या वापराविरोधात सरकारने कठोर भूमिका घेतली

पुढील लेख
Show comments