Festival Posters

इंडो- म्यानमार‘मैत्री पूल’खुला

Webdunia
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018 (09:16 IST)
भारत - म्यानमारला जोडणारा इंडो- म्यानमार ‘मैत्री पूल’वापरासाठी म्यानमारने खुला केला आहे. मणीपूर सीमेजवळील मोरेह शहरातून जाणारा हा पूल खुला झाल्याने म्यानमारमध्ये जाणाऱ्या हिंदुस्थानींना आता विशेष परमीटची गरज भासणार नाही. ही सीमा खुली झाल्याने दोन्ही देशातील मैत्रीपर्वाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज ११ मे रोजी म्यानमार दौऱ्यावर असताना दोन्ही देशातील ही सीमा खुली करण्याबाबत करार झाला होता.
 
तामू- मोरेह या सीमेसह भारत म्यानमार सीमेजवळील चीन प्रातांतील रिखावदार आणि मिझोरामच्या जोखावतार या सीमाही खुल्या करण्यात आल्या आहेत. या सीमा खुल्या झाल्याने दोन्ही देशांचे नागरिक विनापरवाना एकमेकांच्या देशात १६ किलोमीटरपर्यंत प्रवास करु शकणार आहेत. रस्तेमार्गाने जोडण्यासाठी आणि संपर्क वाढवण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यासाठी दोन मोठ्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. तसेच ६९ पूलांच्या नुतनीकरणाचे काम २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या मार्गांमुळे म्यानमारशी असलेले भारताचे संबंध सुधारणार आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

LIVE: अजित पवार यांच्या राजकीय सल्लागाराच्या कंपनीवर पोलिसांची कारवाई

अंबरनाथमध्ये शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणाव

प्रयागराजमधील माघ मेळ्यात भीषण आग लागली; तंबू आणि दुकाने जळून खाक

महाराष्ट्रात निवडणूक प्रचार संपला; १५ जानेवारी रोजी २९ महानगरपालिकांमधील उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएमद्वारे निश्चित केले जाईल

राहुल गांधी अयोध्येला भेट देणार, काँग्रेस खासदाराचा दावा

पुढील लेख
Show comments