Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

20 कोटी लॉटरीचा भारतीय विजेता गायब, दोन्ही फोन नंबरवर संपर्क होत नाहीये

20 कोटी लॉटरीचा भारतीय विजेता गायब  दोन्ही फोन नंबरवर संपर्क होत नाहीये
Webdunia
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (16:41 IST)
20 कोटी लॉटरी लागल्यावर वेड लागण्याची वेळ येईल. परंतु इतकं लकी असून आपल्यापर्यंत ही बाब पोहचली नाही तर... असं काही घडतं आहे युएईमध्ये एका भारतीय नागरिकासोबत. त्याला कोट्यवधी रुपयांची लॉटरी जिंकूनदेखील रक्कम घेण्यासाठी तो पोहोचलेला नाही. 
 
अनेक दिवसांपासून त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु तो नेमका कुठे गेलाय हेच माहित पडत नाहीये. अनेकजण त्याचा शोध घेत आहेत. या व्यक्तीचा फोनच लागत नाहीये आणि त्या व्यक्तीकडूनही कुणाला फोन देखील येत नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या पहिल्या नंबरवर कॉल केल्यानंतर नंबर संपर्कक्षेत्राच्या बाहेर असल्याची सूचना येत आहे तर एकदा इंग्रजीतून आणि एकदा मल्याळी भाषेतून ही सूचना ऐकवली जाते. तर दुसरा नंबर आऊट ऑफ रिच सांगत आहे. हे दोन्ही नंबर लागत नसल्याने नहील यांना संपर्क तरी कसा साधायचा, असा प्रश्न लॉटरी कंपनीला पडला आहे.
 
येथे रविवारी या लकी ड्रॉ चं आयोजन करण्यात आलं होतं. विजेत्या ठरलेल्या लकी ड्रॉचा नंबर होता 278109. लॉटरी जिंकणारा केरळचा मूळ रहिवासी आहे. नहील नावाच्या या व्यक्तीचे दोन्ही मोबाईल नंबर सध्या बंद असून त्यांच्याशी कुठलाही संपर्क होत नसल्याचं सांगण्यात येत आहे.
 
ही लॉटरी दुसऱ्या क्रमांकाने जिंकणारी व्यक्तीदेखील भारतीय आहे. सौदी अरेबियात राहणारे भारतीय प्रवासी अँजेलो फर्नांडिस यांनी लॉटरी जिंकली असून त्यांनी 25 सप्टेंबरला खरेदी केलेल्या तिकीटाचा नंबर 000176 होता.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूर हिंसाचारात जबाबदार लोकांवर कारवाई होणार- भाजप नेते उज्ज्वल निकम

नागपूर हिंसाचारात जबाबदार लोकांवर कारवाई होणार- भाजप नेते उज्ज्वल निकम

Nasik Kumbh: 2027 च्या नाशिक कुंभमेळ्याची तयारी मंद गतीने सुरू आव्हानांवर मात करू', मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान

नागपूरमधील सर्व भागातून 6 दिवसांनी संचारबंदी उठवली, संवेदनशील भागात गस्त सुरूच

Nagpur Violence: नागपूर हिंसाचाराचा बांगलादेशशी संबंध असल्याचा शिवसेना नेते संजय निरुपम यांचा दावा

पुढील लेख
Show comments