Dharma Sangrah

पुन्हा ‘डोकलाम’ सारखी परिस्‍थिती नको

Webdunia
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017 (16:31 IST)

गेल्‍या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्‍या ‘डोकलाम’ वादानंतर प्रथमच दोन्ही देश  ‘ब्रिक्स’ परिषदेच्या निमित्ताने  एकत्र आले आहेत. यावेळी नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्‍ट्राध्य क्षी जिनपिंग यांच्यामध्ये झालेल्‍या द्विपक्षीय बैठकीत ‘डोकलाम’ सारखी परिस्‍थिती पुन्‍हा उद्‌भवणार नाही, यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाल्‍याची माहिती परराष्‍ट्र मंत्रालयाने दिली आहे.  

नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्यामध्ये एका तासापेक्षा अधिक वेळ चर्चा सुरु होती. यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. परराष्‍ट्र मंत्रालयाने दिलेल्‍या माहितीनुसार, येथून पुढे दोन्ही देशांमध्ये ‘डोकलाम’सारखा वाद होणार नाही यावर दोन्ही देशांमध्ये एकम झाले आहे, अशा वादांवर चर्चेतून तोडगा काढण्यात येईल, सीमेवर शांतता राखण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्‍न करण्यात येतील’’

डोकलाम मुद्याबाबत बोलताना परराष्‍ट्र सचिव एस. जयशंकर यांनी सांगितले की, ‘‘आमच्याकडे विकासात्‍मक दृष्‍टीकोन आहे. दोन्ही देशांचे अतीतमध्ये काय झाले होते, याची कल्‍पना आहे. त्‍यामुळे मागच्या गोष्‍टींवर बोलण्यासाठी या बैठकीचे आयोनज केले  नव्हते.’’

यावेळी जयशंकर म्‍हणाले, ‘‘दोन्ही देशांमध्ये ब्रिक्‍सच्या मुद्यांवर चर्चा झाली. चीनने नरेंद्र मोदी यांच्या ब्रिक्‍स परिषदेविषयी असलेल्‍या दृष्‍टीकोणाचे कौतुक केले. चीनचे राष्‍ट्राध्यक्ष शी जिनपिंग नरेंद्र मोदींना म्‍हणाले की, ‘‘चीन आणि भारत जगात झपाट्याने प्रगती करणारे देश आहेत. या दोन्ही देशांमध्ये शांतता आणि सुव्यवस्‍था अबाधित राखण्याची गरज आहे. तसेच चीन भारतासोबत राहून पंचशील तत्‍वानुसार काम करण्यास तयार आहे.’’

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

पनवेल-अलीपुरद्वार अमृत भारत एक्सप्रेस सुरू

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६ चे उद्घाटन केले

LIVE: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा पिवळा इशारा जारी

महाराष्ट्रातील हवामानात बदल, काही भागात तीव्र उष्णतेच्या लाटा तर काही भागात पावसाचा इशारा

दिल्लीत तिहेरी हत्याकांड; पतीने पत्नी आणि तीन मुलींचा गळा चिरून केली निर्घृण हत्या

पुढील लेख
Show comments