Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताचे मानवरहित चांद्रयान 8 वर्षांनंतर सापडले

Webdunia
भारताने 2008 साली पाठविलेले मानवरहित चांद्रयान 1 अजूनही चंद्राच्या कक्षेत भ्रमण करत असल्याची माहिती अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने-नासाने दिली आहे. ते चंद्राच्या पृष्ठभागपासून 200 किमी अंतरावरून चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. 29 ऑगस्ट 2009 रोजी चांद्रयान-1चा इस्रोशी संपर्क तुटला होता. त्यामुळे ते हरवले असे गृहीत धरण्यात आले होते. परंतु तब्बल 8 वर्षांनंतर नासाच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान-1 चा शोध घेण्यात यश मिळवले आहे.अत्यंत लहान आकाराचे(1.5 घनमीटर आकाराचे), म्हणजे साधारणत: मारुती 800 कारएवढे चांद्रयान-1 शोधणे मोठे कठीण काम होते, असे कॅलिफोर्नियातील राडार शास्त्रज्ञ मरिना ब्रोझोविक यांनी म्हटले आहे. त्यासाठी थोडी डिटेक्‍टिव्हगिरी करावी लागली असे त्यांनी सांगितले आहे. त्यासाठी इंटर प्लानेटरी राडारचा वापर करावा लागला. सामान्यत: इंटर प्लानेटरी राडारचा उपयोग हा पृथ्वीपासून लाखो किमी अंतरावरील लघुग्रह शोधण्यासाठी केला जातो.  चांद्रयान-1 चा भ्रमणकाल हा दोन वर्षांचा अपेक्षित होता, त्यामुळे 9 वर्षांनंतर अंतराळात टिकून आहे, ही कौतुकाची गोष्ट आहे. अर्थात चांद्रयान-1 काहीही संदेश पाठवू अथवा स्वीकारू शकत नसल्याने आता केवळ “स्पेस जंक’ – आकाशातील कचरा बनले आहे.

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments