Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Pakistan: पाकिस्तानमध्ये मोठा रेल्वे अपघात, रुळावरून घसरली ट्रेन, 15 जणांचा मृत्यू

Webdunia
रविवार, 6 ऑगस्ट 2023 (16:29 IST)
Pakistan Train Accident  :पाकिस्तानमध्ये मोठा रेल्वे अपघात झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, रावळपिंडीहून धावणाऱ्या हजारा एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 50 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सहारा रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. हे स्टेशन शहजादपूर आणि नवाबशहा दरम्यान आहे. रावळपिंडीहून जाणाऱ्या हजारा एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरून घसरले , त्यात किमान15 जण ठार आणि 50 जण जखमी झाले.
 
जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रेन रुळावरून घसरण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अधिकारी तपास करत आहेत. पाकिस्तानी माध्यमांनी पाकिस्तान रेल्वेचे विभागीय अधीक्षक सुक्कूर मोहम्मदुर रहमान यांच्या हवाल्याने सांगितले आहे की 10 बोगी रुळावरून घसरल्या आहेत. पोलिसांनी सांगितले की, बाधित बोगीतून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. नजीकच्या रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. 

या रेल्वे अपघातानंतर, सिंधच्या अंतर्गत जिल्ह्यांकडे जाणारी आणि जाणाऱ्या गाड्यांचे संचालन थांबवण्यात आले आहे. यासोबतच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना नवाबशहाच्या पीपल्स मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रेल्वे रुळावरून घसरण्याचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
बाधित बोगीतून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी पथके घटनास्थळी उपस्थित आहेत.
 



Edited by - Priya Dixit
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

टीम इंडियाच्या स्वागतासाठी एका दिवसात, 2.2 किमी अंतराच्या रस्त्यावर परेड करणं योग्य होतं?

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

हाथरस दुर्घटना : अनेक बळी जाऊनही गुरुंबद्दल अनुयायी प्रश्न का उपस्थित करत नाहीत?

सुप्रिया सुळेंकडून ‘लाडकी बहीण’ योजनेची प्रशंसा, म्हणाल्या- बेरोजगारी आणि महागाई पाहता योजना चांगली आहे

सट्टेबाजी ऍप प्रकरणामध्ये छत्तीसगढ पोलिसांची मोठी कारवाई, महाराष्ट्र मधून 5 जणांना घेतले ताब्यात

सर्व पहा

नवीन

वृद्ध घरमालकाची घृणास्पद कृती, विद्यार्थिनींचा विनयभंग

चंद्रपुरात मनसे जिल्हाध्यक्षावर गोळ्या झाडल्या, परिसरात खळबळ उडाली

मोदींनी करोडो लोकांना आळशी बनवले, मोफत धान्य देणे म्हणजे विकास नाही, ठाकरे गटाचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

कोटा मध्ये आत्महत्येचा आकडा 14, JEE ची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

आसाम-मणिपुर मध्ये पुरामुळे हाहाकार, 56 जणांचा मृत्यू, 21 लाख लोक प्रभावित, शाळा-कॉलेज बंद

पुढील लेख
Show comments